Cyclone Dana : ‘दाना' चक्रीवादळ उद्या पहाटे धडकणार!

१५० हून अधिक गाड्या रद्द, ओडिशातील कोणार्क मंदिर राहणार बंद


नवी दिल्ली : दाना चक्रीवादळ (Cyclone Dana) शुक्रवारी पहाटे भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि ओडिशातील धामरा बंदरादरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने बुधवारी सांगितले.


पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावरील दाना चक्रीवादळ वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचे गुरुवारी (दि.२४) पहाटे वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दाना चक्रीवादळ २४ ऑक्टोबरची रात्र ते २५ ऑक्टोबरच्या पहाटे दरम्यान भीतरकनिका आणि धामारा (ओडिशा) जवळ पुरी आणि सागर बेटांदरम्यान उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालची किनारपट्टी ओलांडून पुढे जाऊ शकते. यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास १००-११० किमी राहील. वाऱ्याचा वेग प्रति तास १२० किमी पर्यंत वाढू शकतो, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.


या पार्श्वभूमीवर २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या दाना चक्रीवादळ पारादीप (ओडिशा) च्या आग्नेय ५२० किमी, सागर बेटाच्या (पश्चिम बंगाल) ६०० किमी आग्नेय आणि खेपुपारा (बांगला देश) च्या ६१० किमी दक्षिण-पूर्वेस घोंघावत आहे.



१५० हून अधिक गाड्या रद्द, कोणार्क मंदिर बंद


भारतीय हवामान विभागाने मच्छिमारांना २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच दक्षिण रेल्वेने ‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सेलम, इरोड, तिरुपूर आणि कोईम्बतूर मार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान धावणाऱ्या १५० हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. भारतीय तटरक्षक दल अलर्टवर आहे. संभाव्य बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफच्या १३ तुकड्या दक्षिणेकडील भागात तैनात करण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळामुळे २४ आणि २५ ऑक्टोबरला ओडिशातील कोणार्क मंदिर बंद राहणार आहे.

Comments
Add Comment

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक