मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच नाराज असलेले आणि उतावीळ झालेले स्थानिक नेते बंडखोरी आणि पक्ष सोडून जाण्याच्या धमक्या देताहेत. त्यातच पक्षश्रेष्ठींकडून नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेत अद्याप एकवाक्यता झालेली नाही. विदर्भातील जागांवर चर्चेचे घोडे अडले असून ठाकरे गटाने केलेला दावा मागे घ्यावा, अशी काँग्रेस नेत्यांची ठाम भूमिका आहे.
राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना सोमवारी दिल्लीत काँग्रेसने सुमारे ९६ उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. त्यातील ६२ उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी मंगळवारी जाहीर होणार आहे. या जागांपैकी ५८ जागांबाबत कोणताही वाद नसून तिन्ही घटक पक्षांचे एकमत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांवर जाहीर हल्लाबोल केल्यानंतर उबाठा गटाने आम्ही पटोले असतील तर चर्चेला बसणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावर आता काँग्रेसने मवाळ भूमिका घेत जागावाटपाबाबत काँग्रेस व ठाकरे गटातील वाद मिटवण्याची जबाबदारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे.
थोरात आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार आहेत. त्यात जागावाटपाचा तिढा सुटला तर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होईल. त्यानंतर तिन्ही पक्षांची पहिली यादी घोषित होणार आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या एन्ट्रीनंतर तरी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा घोळ संपतो का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…