काँग्रेस-ठाकरे सेनेतील जागावाटपाचा तिढा बाळासाहेब सोडवतील?

आज दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार


मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच नाराज असलेले आणि उतावीळ झालेले स्थानिक नेते बंडखोरी आणि पक्ष सोडून जाण्याच्या धमक्या देताहेत. त्यातच पक्षश्रेष्ठींकडून नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेत अद्याप एकवाक्यता झालेली नाही. विदर्भातील जागांवर चर्चेचे घोडे अडले असून ठाकरे गटाने केलेला दावा मागे घ्यावा, अशी काँग्रेस नेत्यांची ठाम भूमिका आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना सोमवारी दिल्लीत काँग्रेसने सुमारे ९६ उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. त्यातील ६२ उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी मंगळवारी जाहीर होणार आहे. या जागांपैकी ५८ जागांबाबत कोणताही वाद नसून तिन्ही घटक पक्षांचे एकमत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांवर जाहीर हल्लाबोल केल्यानंतर उबाठा गटाने आम्ही पटोले असतील तर चर्चेला बसणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावर आता काँग्रेसने मवाळ भूमिका घेत जागावाटपाबाबत काँग्रेस व ठाकरे गटातील वाद मिटवण्याची जबाबदारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे.

थोरात आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार आहेत. त्यात जागावाटपाचा तिढा सुटला तर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होईल. त्यानंतर तिन्ही पक्षांची पहिली यादी घोषित होणार आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या एन्ट्रीनंतर तरी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा घोळ संपतो का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत यांच्या खंडपीठाने १२ नोव्हेंबरची तारीख ही निकालासाठी दिलेली

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी