Terrorist Pannu : आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी एअर इंडियातून प्रवास करु नये, कारण...

दहशतवादी पन्नूने दिली विमान उडवून टाकण्याची धमकी


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक विमान कंपन्यांना विमान बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे हवाई वाहतूक विभाग, विमानतळ आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे.


शीख दंगलीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही एअर इंडियाच्या विमानांवर हल्ला करु. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियातून प्रवास करु नये, अशी धमकी पन्नूने दिली आहे.



कोण आहे पन्नू?


शीख फॉर जस्टिस या संघटनेची स्थापना करणारा पन्नू हा नेहमी भारताविरोधात गरळ ओकत आहे. खलिस्तानच्या नावाखाली लोकांना भडकावल्यामुळे भारताने पन्नूला दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्यावर फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा आणि पंजाबी शीख तरुणांना शस्त्रे घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पन्नू याला केंद्र सरकारने २०२० मध्ये, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्या शीख फॉर जस्टिस वरही बंदी घालण्यात आली आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर