Terrorist Pannu : आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी एअर इंडियातून प्रवास करु नये, कारण...

  61

दहशतवादी पन्नूने दिली विमान उडवून टाकण्याची धमकी


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक विमान कंपन्यांना विमान बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे हवाई वाहतूक विभाग, विमानतळ आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे.


शीख दंगलीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही एअर इंडियाच्या विमानांवर हल्ला करु. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियातून प्रवास करु नये, अशी धमकी पन्नूने दिली आहे.



कोण आहे पन्नू?


शीख फॉर जस्टिस या संघटनेची स्थापना करणारा पन्नू हा नेहमी भारताविरोधात गरळ ओकत आहे. खलिस्तानच्या नावाखाली लोकांना भडकावल्यामुळे भारताने पन्नूला दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्यावर फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा आणि पंजाबी शीख तरुणांना शस्त्रे घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पन्नू याला केंद्र सरकारने २०२० मध्ये, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्या शीख फॉर जस्टिस वरही बंदी घालण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व