Diwali Special Train : प्रवाशांच्या कन्फर्म तिकीटांची चिंता मिटली! दिवाळीनिमित्त मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या

मुंबई : उन्हाळी सुट्टीसह विविध सणात अनेक चाकरमानी गावाकडे जातात. अशातच दिवाळी सण अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहता मध्य रेल्वेने (Central Railway) दिवाळीनिमित्त ५७० विशेष सेवा (Diwali Special Train) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार असून कन्फर्म तिकीटाची चिंताही मिटणार आहे.


मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूर येथून देशाच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेच्या ५७० विशेष सेवा सुरू केल्या आहेत. या सेवा ८५ एक्स्प्रेस गाड्यांद्वारे दिल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या या सेवेमार्फत १८० गाड्या लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणाहून धावणार आहेत. तर ३७८ सेवा उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळ, संत्रागाछी या विविध भागातील प्रवाशांसाठी असणार आहेत.


याशिवाय दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी ८४ विशेष गाड्या करीमनगर, कोचुवेली, काझीपेट आणि बेंगळुरूपर्यंत धावणार आहेत.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,