Diwali Special Train : प्रवाशांच्या कन्फर्म तिकीटांची चिंता मिटली! दिवाळीनिमित्त मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या

मुंबई : उन्हाळी सुट्टीसह विविध सणात अनेक चाकरमानी गावाकडे जातात. अशातच दिवाळी सण अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहता मध्य रेल्वेने (Central Railway) दिवाळीनिमित्त ५७० विशेष सेवा (Diwali Special Train) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार असून कन्फर्म तिकीटाची चिंताही मिटणार आहे.


मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूर येथून देशाच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेच्या ५७० विशेष सेवा सुरू केल्या आहेत. या सेवा ८५ एक्स्प्रेस गाड्यांद्वारे दिल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या या सेवेमार्फत १८० गाड्या लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणाहून धावणार आहेत. तर ३७८ सेवा उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळ, संत्रागाछी या विविध भागातील प्रवाशांसाठी असणार आहेत.


याशिवाय दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी ८४ विशेष गाड्या करीमनगर, कोचुवेली, काझीपेट आणि बेंगळुरूपर्यंत धावणार आहेत.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,