Diwali Special Train : प्रवाशांच्या कन्फर्म तिकीटांची चिंता मिटली! दिवाळीनिमित्त मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या

  131

मुंबई : उन्हाळी सुट्टीसह विविध सणात अनेक चाकरमानी गावाकडे जातात. अशातच दिवाळी सण अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहता मध्य रेल्वेने (Central Railway) दिवाळीनिमित्त ५७० विशेष सेवा (Diwali Special Train) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार असून कन्फर्म तिकीटाची चिंताही मिटणार आहे.


मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूर येथून देशाच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेच्या ५७० विशेष सेवा सुरू केल्या आहेत. या सेवा ८५ एक्स्प्रेस गाड्यांद्वारे दिल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या या सेवेमार्फत १८० गाड्या लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणाहून धावणार आहेत. तर ३७८ सेवा उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळ, संत्रागाछी या विविध भागातील प्रवाशांसाठी असणार आहेत.


याशिवाय दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी ८४ विशेष गाड्या करीमनगर, कोचुवेली, काझीपेट आणि बेंगळुरूपर्यंत धावणार आहेत.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला