तुम्हीही फोनवर कव्हर लावता का? जाणून घ्या नुकसान

मुंबई: स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक जण फोनच्या कव्हरचा वापर करतात. यामुळे फोन पडण्यापासून बचाव होतो. मात्र कव्हर लावण्याचे अनेक नुकसानही आहेत.


मागील कव्हरमुळे फोनची उष्णता योग्य पद्धतीने पास होत नाही. यामुळे फोन लवकर गरम होतो आणि त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. फोन गरम होणे त्यातील अनेक पार्टसाठी चांगले नसते. तुमच्या स्मार्टफोनचे अनेक सेन्सॉर असतात जे अधिक उष्ण झाल्याने खराब होऊ शकतात.


अनेकदा हेही पाहायला मिळाले आहे की मागील कव्हरमुळे फोनला सिग्नल कमी मिळतो. यामुळे कॉल क्वालिटी आणि इंटरनेट स्पीडवरही परिणाम होतो. इतकंच नव्हे तर फोनच्या कव्हरमुळे फोन अधिक गरम होतो. तसेच चार्जिंग स्पीडही स्लो होतो. याचा परिणाम आपल्या बॅटरीवरही पडू शकतो.


स्मार्टफोन गरम झाल्याने त्याच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होतो. फोन अधिक उष्ण झाल्याने अनेक फीचर्स काम करणे बंद होतात आणि अनेकदा तर फोन ऑफही होतो.



नेहमी योग्य कव्हर खरेदी करा


स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य बॅक कव्हर निवडले पाहिजे. ब्राँडेड फोन्ससाठी स्पेशल कव्हर बनवलेले असतात जे थोडे महागडे असतात. तुम्ही त्यातील निवडू शकता.



विना कव्हरचा वापर


जर तुमच्या हातातून फोन पडत नसेल आणि तुम्ही डिव्हाईसचे नीट लक्ष देत असाल तर तुम्ही स्मार्टफोन विना कव्हर वापरू शकता. यामुळे तुम्हाला वेगळा अनुभव भेटेल. दीर्घकाळ फोनला जर कव्हर लावून ठेवले तर फोनवर निशाण पडतात. याशिवाय अनेक पार्ट्समध्ये घाणही जमा होते. यामुळे तो वेळच्या वेळी साफ केला पाहिजे.

Comments
Add Comment

Summer Vacation : शाळा सुटली, उन्हाळी सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यातील उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या तापमानात विद्यार्थी शाळेत येण्याच्या निमित्ताने

Banks Closed : मे महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

मुंबई : मे 2026 महिन्यात देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, विविध सण, राष्ट्रीय आणि

Mira-Bhayandar terror scare : आरोपी जुबैर ‘जिहाद’च्या नावाखाली हिंदूंवर हल्ला करू इच्छित होता- मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, मीरा रोड येथे झालेला संशयित ‘लोन वुल्फ’

Mantralaya : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या

Devendra Fadanvis : शिवरायांच्या नावावर निरर्थक वाद उकरून काढणे संतापजनक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आक्षेप घेणाऱ्यांनी 'शिवाजी कोण होता?' पुस्तक वाचले का? मुंबई : "छत्रपती शिवाजी

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत नवा फॉर्म्युला

दंडात्मक कारवाईला तूर्तास ब्रेक; १ मेपासून राज्यव्यापी मोहीम, चालकांना सहा महिन्यांचा 'दिलासा' मुंबई : राज्यातील