तुम्हीही फोनवर कव्हर लावता का? जाणून घ्या नुकसान

मुंबई: स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक जण फोनच्या कव्हरचा वापर करतात. यामुळे फोन पडण्यापासून बचाव होतो. मात्र कव्हर लावण्याचे अनेक नुकसानही आहेत.


मागील कव्हरमुळे फोनची उष्णता योग्य पद्धतीने पास होत नाही. यामुळे फोन लवकर गरम होतो आणि त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. फोन गरम होणे त्यातील अनेक पार्टसाठी चांगले नसते. तुमच्या स्मार्टफोनचे अनेक सेन्सॉर असतात जे अधिक उष्ण झाल्याने खराब होऊ शकतात.


अनेकदा हेही पाहायला मिळाले आहे की मागील कव्हरमुळे फोनला सिग्नल कमी मिळतो. यामुळे कॉल क्वालिटी आणि इंटरनेट स्पीडवरही परिणाम होतो. इतकंच नव्हे तर फोनच्या कव्हरमुळे फोन अधिक गरम होतो. तसेच चार्जिंग स्पीडही स्लो होतो. याचा परिणाम आपल्या बॅटरीवरही पडू शकतो.


स्मार्टफोन गरम झाल्याने त्याच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होतो. फोन अधिक उष्ण झाल्याने अनेक फीचर्स काम करणे बंद होतात आणि अनेकदा तर फोन ऑफही होतो.



नेहमी योग्य कव्हर खरेदी करा


स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य बॅक कव्हर निवडले पाहिजे. ब्राँडेड फोन्ससाठी स्पेशल कव्हर बनवलेले असतात जे थोडे महागडे असतात. तुम्ही त्यातील निवडू शकता.



विना कव्हरचा वापर


जर तुमच्या हातातून फोन पडत नसेल आणि तुम्ही डिव्हाईसचे नीट लक्ष देत असाल तर तुम्ही स्मार्टफोन विना कव्हर वापरू शकता. यामुळे तुम्हाला वेगळा अनुभव भेटेल. दीर्घकाळ फोनला जर कव्हर लावून ठेवले तर फोनवर निशाण पडतात. याशिवाय अनेक पार्ट्समध्ये घाणही जमा होते. यामुळे तो वेळच्या वेळी साफ केला पाहिजे.

Comments
Add Comment

FIFA World Cup Final 2026 : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आता थेट पहाटे ४ पर्यंत हॉटेलमधून लुटता येणार मॅचचा आनंद

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना महाराष्ट्रातील फुटबॉल

Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले दोघांचे प्राण

मुंबई(Mumbai) : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एका आलिशान पोर्शे कारचा भीषण अपघात

Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा

Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल

Juhu Chowpatty : जुहू समुद्रकिना-याची स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक

मागील एक महिन्यांपासून जेसीबी, डंपरचे कंत्राट आले होते संपुष्टात मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील पावसाळ्यात

Mumbai's water stock : मुंबईचा पाणी साठा ५० टक्के पार; सर्व धरणांमध्ये सध्या ५०.७७ टक्के पाणीसाठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याचा साठा जा मागील काही दिवसांपासून ५०