परतीच्या पावसात धुक्याचे सावट; बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण!

खोपोली : परतीच्या पावसात धुक्याचे सावट पसरले आह. तर पहाटे गारवा,दुपारी रणरणत्या उन्हाने नागरीक हैराण झाले आहेत. वातावरणात सातत्याने बदल घडत असल्यामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्याचबरोबर दुपारी रणरणत्या उन्हामुळे नागरिक चांगलेच मेटाकुटीला आले आहे. पहाटे धुके मोठ्या प्रमाणात पडत असले तरी सुद्धा सायंकाळी आकाशात ढग दाटून येत आहे. यामुळे हा पावसाळा म्हणावे की उन्हाळा म्हणावा की हिवाळा अशिच स्थिती बळीराजाची झाली आहे. भात शेती उत्तम बहरली असून काही ठिकाणी धरतीवर सोनेरी शाल परिधान केलीली जाणवू लागले आहे. मात्र सायंकाळ होताच बळीराजाच्या तोंडचे पाणी पळत आहे.


अनेक दिवस विश्रांतीवर गेलेल्या या पावसामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढला. घामाच्या धारांनी नागरिक अक्षरश: हैराण झाले. जवळपास संपूर्ण कोकणात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. पावसाच्या सरीही मोठ्या होत्या आणि वाऱ्याचा वेग वाढल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी भाताच्या पिकाची कापणी केली होती. मात्र, या परतीच्या पावसामुळे ते भातपीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सकाळी जरी वातावरणात धुके पडत असले तरी सुद्धा गुलाबी थंडी जाणवत नाही. मात्र धुक्यामुळे वाट काढले वाहनचालकांस अवघड जात आहे.


त्याचबरोबर दुपारी सुर्यदेवाचे ते उग्र रुप आंगातून अक्षरशा: घामाच्या धारा वाहू लागत आहे. सायंकाळी अकाशात ढग निर्माण होवून पाऊस पडत असल्यामुळे शेतात तयार झालेले धान्य या पावसामुळे नुकसान होण्याच्या मार्गावर असतान शेतकरी चांगलाच धास्तावलेले आहे. भाताच्या लोंब्यांमध्ये दाणा तयार झाला असून सुर्याच्या प्रखर उष्णतेमुळे लोंब्यातील दाणा अलग होत आहे. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणी खोळंबली आहे. पाऊस पडला तर हाताला भाताचा दाणा मिळणार नाही. या विचारांतून बळीराजा मोठ्या संकटात सापडले आहे. दरवर्षी हस्त नक्षत्रांचा पाउस शेतीचे नुकसान करीत असल्यामुळे शेती करण्यासाठी बळीराजा पाठ फिरवत आहे. मात्र आपला उदारनिर्वाह शेतीवरच असल्यामुळे शेती शिवाय पर्याय नाही. पाऊस शांत झाला असता तर भात कापणींस पारंभ झाला असता, मात्र सायंकाळी येत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

Comments
Add Comment

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक