परतीच्या पावसात धुक्याचे सावट; बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण!

खोपोली : परतीच्या पावसात धुक्याचे सावट पसरले आह. तर पहाटे गारवा,दुपारी रणरणत्या उन्हाने नागरीक हैराण झाले आहेत. वातावरणात सातत्याने बदल घडत असल्यामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्याचबरोबर दुपारी रणरणत्या उन्हामुळे नागरिक चांगलेच मेटाकुटीला आले आहे. पहाटे धुके मोठ्या प्रमाणात पडत असले तरी सुद्धा सायंकाळी आकाशात ढग दाटून येत आहे. यामुळे हा पावसाळा म्हणावे की उन्हाळा म्हणावा की हिवाळा अशिच स्थिती बळीराजाची झाली आहे. भात शेती उत्तम बहरली असून काही ठिकाणी धरतीवर सोनेरी शाल परिधान केलीली जाणवू लागले आहे. मात्र सायंकाळ होताच बळीराजाच्या तोंडचे पाणी पळत आहे.


अनेक दिवस विश्रांतीवर गेलेल्या या पावसामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढला. घामाच्या धारांनी नागरिक अक्षरश: हैराण झाले. जवळपास संपूर्ण कोकणात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. पावसाच्या सरीही मोठ्या होत्या आणि वाऱ्याचा वेग वाढल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी भाताच्या पिकाची कापणी केली होती. मात्र, या परतीच्या पावसामुळे ते भातपीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सकाळी जरी वातावरणात धुके पडत असले तरी सुद्धा गुलाबी थंडी जाणवत नाही. मात्र धुक्यामुळे वाट काढले वाहनचालकांस अवघड जात आहे.


त्याचबरोबर दुपारी सुर्यदेवाचे ते उग्र रुप आंगातून अक्षरशा: घामाच्या धारा वाहू लागत आहे. सायंकाळी अकाशात ढग निर्माण होवून पाऊस पडत असल्यामुळे शेतात तयार झालेले धान्य या पावसामुळे नुकसान होण्याच्या मार्गावर असतान शेतकरी चांगलाच धास्तावलेले आहे. भाताच्या लोंब्यांमध्ये दाणा तयार झाला असून सुर्याच्या प्रखर उष्णतेमुळे लोंब्यातील दाणा अलग होत आहे. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणी खोळंबली आहे. पाऊस पडला तर हाताला भाताचा दाणा मिळणार नाही. या विचारांतून बळीराजा मोठ्या संकटात सापडले आहे. दरवर्षी हस्त नक्षत्रांचा पाउस शेतीचे नुकसान करीत असल्यामुळे शेती करण्यासाठी बळीराजा पाठ फिरवत आहे. मात्र आपला उदारनिर्वाह शेतीवरच असल्यामुळे शेती शिवाय पर्याय नाही. पाऊस शांत झाला असता तर भात कापणींस पारंभ झाला असता, मात्र सायंकाळी येत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर