5 Days Working : बँक कर्मचा-यांना लॉटरी! फक्त ५ दिवस काम, वेळेतही होणार बदल

  180

नवी दिल्ली : आता देशातील सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये पाच कामकाजाचे दिवस सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही खुशखबर डिसेंबरमध्ये बँक कर्मचा-यांना मिळू शकते.


बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून सरकारकडे आठवड्यात पाच दिवस कामाची मागणी करत होते. ज्यावर सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या वर्षअखेरीस सरकार प्रलंबित मागण्या मान्य करू शकते, असे समजते.


सध्या बँक कर्मचा-यांना महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सुटी मिळते तर पहिल्या, तिस-या आणि पाचव्या शनिवारी कामकाज करावे लागते. याबाबत कर्मचारी संघटना आणि बँक संघटना यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.


आठवड्यातून पाच तर महिन्यात १५ दिवस कामाची मागणी सरकारने मंजूर केल्यास बँक कर्मचा-यांच्या कामाच्या वेळाही बदलतील. अहवालानुसार, पाच दिवसांच्या कामात तास सुमारे ४० मिनिटांनी वाढले जाऊ शकतात. या कालावधीत बँका सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहतील तर सध्या सरकारी सुटी वगळता दुस-या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतात. बँकेतील कामकाजाच्या दिवसांबाबत बँक युनियन २०१५ पासून मागणी करत असून दर शनिवार आणि रविवारी सुट्टी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. हीच मागणी लक्षात घेऊन २०१५ मध्ये दुस-या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बँकिंग तास आणि बॅंकांतर्गत कामकाजावर नियंत्रण ठेवते त्यामुळे हा प्रस्ताव आरबीआयकडेही पाठवला जाईल. अद्यापपर्यंत या प्रस्तावावर सरकारने मंजुरीची वेळ निश्चित केलेली नाही मात्र, वर्षअखेरीस याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँक कर्मचा-यांना पाच दिवस कामाचा आठवडा लागू झाल्यास ग्राहकांना विकेण्डला बँकेतील कामे करण्यात अडचणी येतील.

Comments
Add Comment

निवडणूक आयोगाची उद्या दिल्लीत पत्रकार परिषद, नेमकी कशासाठी?

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग उद्या, रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता नॅशनल मिडिया सेंटर नवी दिल्ली येथे

FASTag वार्षिक पासला प्रचंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी १.४ लाख पासची बुकिंग

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासला पहिल्याच दिवशी

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील