5 Days Working : बँक कर्मचा-यांना लॉटरी! फक्त ५ दिवस काम, वेळेतही होणार बदल

नवी दिल्ली : आता देशातील सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये पाच कामकाजाचे दिवस सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही खुशखबर डिसेंबरमध्ये बँक कर्मचा-यांना मिळू शकते.


बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून सरकारकडे आठवड्यात पाच दिवस कामाची मागणी करत होते. ज्यावर सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या वर्षअखेरीस सरकार प्रलंबित मागण्या मान्य करू शकते, असे समजते.


सध्या बँक कर्मचा-यांना महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सुटी मिळते तर पहिल्या, तिस-या आणि पाचव्या शनिवारी कामकाज करावे लागते. याबाबत कर्मचारी संघटना आणि बँक संघटना यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.


आठवड्यातून पाच तर महिन्यात १५ दिवस कामाची मागणी सरकारने मंजूर केल्यास बँक कर्मचा-यांच्या कामाच्या वेळाही बदलतील. अहवालानुसार, पाच दिवसांच्या कामात तास सुमारे ४० मिनिटांनी वाढले जाऊ शकतात. या कालावधीत बँका सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहतील तर सध्या सरकारी सुटी वगळता दुस-या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतात. बँकेतील कामकाजाच्या दिवसांबाबत बँक युनियन २०१५ पासून मागणी करत असून दर शनिवार आणि रविवारी सुट्टी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. हीच मागणी लक्षात घेऊन २०१५ मध्ये दुस-या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बँकिंग तास आणि बॅंकांतर्गत कामकाजावर नियंत्रण ठेवते त्यामुळे हा प्रस्ताव आरबीआयकडेही पाठवला जाईल. अद्यापपर्यंत या प्रस्तावावर सरकारने मंजुरीची वेळ निश्चित केलेली नाही मात्र, वर्षअखेरीस याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँक कर्मचा-यांना पाच दिवस कामाचा आठवडा लागू झाल्यास ग्राहकांना विकेण्डला बँकेतील कामे करण्यात अडचणी येतील.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या