5 Days Working : बँक कर्मचा-यांना लॉटरी! फक्त ५ दिवस काम, वेळेतही होणार बदल

नवी दिल्ली : आता देशातील सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये पाच कामकाजाचे दिवस सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही खुशखबर डिसेंबरमध्ये बँक कर्मचा-यांना मिळू शकते.


बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून सरकारकडे आठवड्यात पाच दिवस कामाची मागणी करत होते. ज्यावर सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या वर्षअखेरीस सरकार प्रलंबित मागण्या मान्य करू शकते, असे समजते.


सध्या बँक कर्मचा-यांना महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सुटी मिळते तर पहिल्या, तिस-या आणि पाचव्या शनिवारी कामकाज करावे लागते. याबाबत कर्मचारी संघटना आणि बँक संघटना यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.


आठवड्यातून पाच तर महिन्यात १५ दिवस कामाची मागणी सरकारने मंजूर केल्यास बँक कर्मचा-यांच्या कामाच्या वेळाही बदलतील. अहवालानुसार, पाच दिवसांच्या कामात तास सुमारे ४० मिनिटांनी वाढले जाऊ शकतात. या कालावधीत बँका सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहतील तर सध्या सरकारी सुटी वगळता दुस-या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतात. बँकेतील कामकाजाच्या दिवसांबाबत बँक युनियन २०१५ पासून मागणी करत असून दर शनिवार आणि रविवारी सुट्टी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. हीच मागणी लक्षात घेऊन २०१५ मध्ये दुस-या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बँकिंग तास आणि बॅंकांतर्गत कामकाजावर नियंत्रण ठेवते त्यामुळे हा प्रस्ताव आरबीआयकडेही पाठवला जाईल. अद्यापपर्यंत या प्रस्तावावर सरकारने मंजुरीची वेळ निश्चित केलेली नाही मात्र, वर्षअखेरीस याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँक कर्मचा-यांना पाच दिवस कामाचा आठवडा लागू झाल्यास ग्राहकांना विकेण्डला बँकेतील कामे करण्यात अडचणी येतील.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव