स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी'त बिघाडीच होणार; मविआतील वादावरून शिंदेंची टीका

महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे आणि त्यात बिघाडी होणारच आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावात गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौऱ्याच्या धावपळीतसुद्धा गाईंच्या गोठ्यात जाऊन तेथील गाईंना चारा खायला घातल्याचं पाहायला मिळालं.


यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ''देवाला काही मागावं नाही लागत, दडवाला सगळं माहित आहे. बळिराजाला चांगले दिवस येऊ देत असं मागणं मागतो. बळिराजाचा सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या आहेत. महाविकास आघाडीची अडिच वर्षांची कारकिर्द आणि महायुतीची दोन ते सव्वादोन वर्षांची कारकिर्दची तुलना तुम्ही कराच. जनतेच्या समोर जातोय दुध का दुध पाणी का पाणी आता जनताच करेल. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता महायुतीला पोहोच पावती देईल. आता महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कोणाला किती जागा मिळणार आहेत हे दोन दिवसांत ठरेल. सगळ्या गोष्टी सन्मानानं होतील. मुख्यमंत्रीपदासाठी विरोधकांकडे सगळे गल्लीत आणि दिल्लीत फिरत आहेत. महाविकास आघाडी ही फक्त स्वार्थासाठी झालेली आघाडी त्यात बिघाडीच होणार आहे. बाळसाहेबांचे विचार त्यांनी सोडले आहेत, त्यांना पराभव दिसत आहे त्यामुळे आता त्यांना सगळ्यात घोळ दिसत आहे, अशी टीका शिंदेनी केली आहे.


दरम्यान, शरद पवारांच्या पक्षाने ठरवावं मुख्यमंत्री कोण हा त्यांचा अधिकार आहे. महायुतीलाच जनतेचा कौल असल्याने त्यांनी आता विरोधी पक्ष नेत्याचा उमेदवार ठरवायला हवा. आमच्यात कोणताच वाद नाही आम्ही आमच्या कामाला आणि विकासाला महत्व देतो. मी कॉमन मॅन मुख्यमंत्री आहे. जनता आम्हाला आमच्या कामाची पोचपावती देईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी