SSC HSC Exam : १०वी-१२वी परिक्षेचे खोटे वेळापत्रक व्हायरल! राज्य मंडळांने अधिकृतपणे केला खुलासा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या कालावधीत दहावी-बारावी बोर्डाचे (SSC HSC Exam) परीक्षा घेण्यात येतात. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून (Education Department) परिक्षेचे वेळापत्रक देखील जारी केले जाते. मात्र सध्या सोशल मीडियावर १०वी-१२वी २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परिक्षेचे वेळापत्रक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच परिक्षांच्या (Exam Timetable) तारखांबाबत चुकीच्या अफवाही पसरवल्या जात असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याप्रकरणावर बोर्डाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.


दहावी बारावीच्या परिक्षांबाबत पसरवल्या जाणाऱ्या मेसेजबाबत राज्य मंडळांने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक विषयावर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.


दरम्यान, फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परिक्षांची वेळापत्रके www.mahasscboard.in या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असेही म्हटले आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे