Railway Ticket Booking : रिझर्व्हेशन बुकिंगबाबत रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम!

आरक्षण केंद्रांवर प्रवाशांची उडणार झुंबड!


नवी दिल्ली : गावी जायचं म्हटलं की प्रत्येकजण रेल्वेला पहिली पसंती देतो. उन्हाळी सुट्टी, गणपती, दिवाळी किंवा कोणताही सण असल्यास अनेकजण गावी जातात. मात्र त्यांना चार महिन्याआधीपासूनच तिकीट आरक्षित करावे लागत होते. मात्र आता याच तिकीट बुकिंगबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


रेल्वे मंत्रालयाने तिकीट आरक्षणाबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार यापूर्वी प्रवाशांना चार महिन्यापूर्वी आगाऊ तिकीट बुकिंग करावे लागत होते. मात्र आता नव्या नियमावलीनुसार ६० दिवस म्हणजे दोन महिने आधीच तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) जारी केलेला हा नियम पुढील महिन्यापासून लागू होणार आहे.



कोणत्या रेल्वेला नियम लागू नसणार?


तिकीट आरक्षणाचा बदलेला नियम ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस अशा काही दिवसांसाठी चालणाऱ्या गाड्यांसाठी लागू नसणार.



प्रवाशांना फायदा होणार की अडचण?


प्रवाशांना चार महिन्यापूर्वी तिकीट आरक्षित करताना अशावेळी एखाद्याचे तिकीट वेटिंगवर असल्यास ते कन्फर्म होण्यासाठी वेळ लागत होता. मात्र आता प्रवाशांना दोन महिन्यातच तिकीट कन्फर्म होणार ते कळू शकणार आहे.


त्याचबरोबर तिकीट बुकिंगसाठी केवळ दोन महिन्याचा कालावधी असल्यामुळे प्रवाशांची तिकीट आरक्षण केंद्रावर एकाचवेळी झुंबड उडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात