Railway Ticket Booking : रिझर्व्हेशन बुकिंगबाबत रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम!

आरक्षण केंद्रांवर प्रवाशांची उडणार झुंबड!


नवी दिल्ली : गावी जायचं म्हटलं की प्रत्येकजण रेल्वेला पहिली पसंती देतो. उन्हाळी सुट्टी, गणपती, दिवाळी किंवा कोणताही सण असल्यास अनेकजण गावी जातात. मात्र त्यांना चार महिन्याआधीपासूनच तिकीट आरक्षित करावे लागत होते. मात्र आता याच तिकीट बुकिंगबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


रेल्वे मंत्रालयाने तिकीट आरक्षणाबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार यापूर्वी प्रवाशांना चार महिन्यापूर्वी आगाऊ तिकीट बुकिंग करावे लागत होते. मात्र आता नव्या नियमावलीनुसार ६० दिवस म्हणजे दोन महिने आधीच तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) जारी केलेला हा नियम पुढील महिन्यापासून लागू होणार आहे.



कोणत्या रेल्वेला नियम लागू नसणार?


तिकीट आरक्षणाचा बदलेला नियम ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस अशा काही दिवसांसाठी चालणाऱ्या गाड्यांसाठी लागू नसणार.



प्रवाशांना फायदा होणार की अडचण?


प्रवाशांना चार महिन्यापूर्वी तिकीट आरक्षित करताना अशावेळी एखाद्याचे तिकीट वेटिंगवर असल्यास ते कन्फर्म होण्यासाठी वेळ लागत होता. मात्र आता प्रवाशांना दोन महिन्यातच तिकीट कन्फर्म होणार ते कळू शकणार आहे.


त्याचबरोबर तिकीट बुकिंगसाठी केवळ दोन महिन्याचा कालावधी असल्यामुळे प्रवाशांची तिकीट आरक्षण केंद्रावर एकाचवेळी झुंबड उडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे