नवी दिल्ली : गावी जायचं म्हटलं की प्रत्येकजण रेल्वेला पहिली पसंती देतो. उन्हाळी सुट्टी, गणपती, दिवाळी किंवा कोणताही सण असल्यास अनेकजण गावी जातात. मात्र त्यांना चार महिन्याआधीपासूनच तिकीट आरक्षित करावे लागत होते. मात्र आता याच तिकीट बुकिंगबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
रेल्वे मंत्रालयाने तिकीट आरक्षणाबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार यापूर्वी प्रवाशांना चार महिन्यापूर्वी आगाऊ तिकीट बुकिंग करावे लागत होते. मात्र आता नव्या नियमावलीनुसार ६० दिवस म्हणजे दोन महिने आधीच तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) जारी केलेला हा नियम पुढील महिन्यापासून लागू होणार आहे.
तिकीट आरक्षणाचा बदलेला नियम ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस अशा काही दिवसांसाठी चालणाऱ्या गाड्यांसाठी लागू नसणार.
प्रवाशांना चार महिन्यापूर्वी तिकीट आरक्षित करताना अशावेळी एखाद्याचे तिकीट वेटिंगवर असल्यास ते कन्फर्म होण्यासाठी वेळ लागत होता. मात्र आता प्रवाशांना दोन महिन्यातच तिकीट कन्फर्म होणार ते कळू शकणार आहे.
त्याचबरोबर तिकीट बुकिंगसाठी केवळ दोन महिन्याचा कालावधी असल्यामुळे प्रवाशांची तिकीट आरक्षण केंद्रावर एकाचवेळी झुंबड उडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…