Railway Ticket Booking : रिझर्व्हेशन बुकिंगबाबत रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम!

आरक्षण केंद्रांवर प्रवाशांची उडणार झुंबड!


नवी दिल्ली : गावी जायचं म्हटलं की प्रत्येकजण रेल्वेला पहिली पसंती देतो. उन्हाळी सुट्टी, गणपती, दिवाळी किंवा कोणताही सण असल्यास अनेकजण गावी जातात. मात्र त्यांना चार महिन्याआधीपासूनच तिकीट आरक्षित करावे लागत होते. मात्र आता याच तिकीट बुकिंगबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


रेल्वे मंत्रालयाने तिकीट आरक्षणाबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार यापूर्वी प्रवाशांना चार महिन्यापूर्वी आगाऊ तिकीट बुकिंग करावे लागत होते. मात्र आता नव्या नियमावलीनुसार ६० दिवस म्हणजे दोन महिने आधीच तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) जारी केलेला हा नियम पुढील महिन्यापासून लागू होणार आहे.



कोणत्या रेल्वेला नियम लागू नसणार?


तिकीट आरक्षणाचा बदलेला नियम ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस अशा काही दिवसांसाठी चालणाऱ्या गाड्यांसाठी लागू नसणार.



प्रवाशांना फायदा होणार की अडचण?


प्रवाशांना चार महिन्यापूर्वी तिकीट आरक्षित करताना अशावेळी एखाद्याचे तिकीट वेटिंगवर असल्यास ते कन्फर्म होण्यासाठी वेळ लागत होता. मात्र आता प्रवाशांना दोन महिन्यातच तिकीट कन्फर्म होणार ते कळू शकणार आहे.


त्याचबरोबर तिकीट बुकिंगसाठी केवळ दोन महिन्याचा कालावधी असल्यामुळे प्रवाशांची तिकीट आरक्षण केंद्रावर एकाचवेळी झुंबड उडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना