IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यावर पावसाचं सावट; खेळ रद्द होण्याची शक्यता!

बंगळुरू : आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. मात्र हा सामना होण्यापूर्वीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी शाळांसह कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. पावसाचा कहर सुरू असताना याचा फटका आजपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यावरही पडणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बंगळुरूमध्ये पावसाने थैमान घातले आहे. या ठिकाणी ऑर्रंज अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणारा पहिलाच सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



हवामान विभागाने काय म्हटले?


पूर्ण दिवस ढगाळ वातावरण असून संपूर्ण दिवस पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दुपारी २ च्या सुमारास पावसाचा जोर थांबणार असला तरीही ४ वाजेच्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल.


या सामन्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी नव्हे तर पाचही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे हा कसोटी सामना रद्द होण्याचा अंदाज दिला जात आहे.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे