IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यावर पावसाचं सावट; खेळ रद्द होण्याची शक्यता!

बंगळुरू : आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. मात्र हा सामना होण्यापूर्वीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी शाळांसह कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. पावसाचा कहर सुरू असताना याचा फटका आजपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यावरही पडणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बंगळुरूमध्ये पावसाने थैमान घातले आहे. या ठिकाणी ऑर्रंज अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणारा पहिलाच सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



हवामान विभागाने काय म्हटले?


पूर्ण दिवस ढगाळ वातावरण असून संपूर्ण दिवस पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दुपारी २ च्या सुमारास पावसाचा जोर थांबणार असला तरीही ४ वाजेच्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल.


या सामन्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी नव्हे तर पाचही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे हा कसोटी सामना रद्द होण्याचा अंदाज दिला जात आहे.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर