IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यावर पावसाचं सावट; खेळ रद्द होण्याची शक्यता!

बंगळुरू : आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. मात्र हा सामना होण्यापूर्वीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी शाळांसह कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. पावसाचा कहर सुरू असताना याचा फटका आजपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यावरही पडणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बंगळुरूमध्ये पावसाने थैमान घातले आहे. या ठिकाणी ऑर्रंज अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणारा पहिलाच सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



हवामान विभागाने काय म्हटले?


पूर्ण दिवस ढगाळ वातावरण असून संपूर्ण दिवस पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दुपारी २ च्या सुमारास पावसाचा जोर थांबणार असला तरीही ४ वाजेच्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल.


या सामन्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी नव्हे तर पाचही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे हा कसोटी सामना रद्द होण्याचा अंदाज दिला जात आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी