बंगळुरू : आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. मात्र हा सामना होण्यापूर्वीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी शाळांसह कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. पावसाचा कहर सुरू असताना याचा फटका आजपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यावरही पडणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बंगळुरूमध्ये पावसाने थैमान घातले आहे. या ठिकाणी ऑर्रंज अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणारा पहिलाच सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पूर्ण दिवस ढगाळ वातावरण असून संपूर्ण दिवस पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दुपारी २ च्या सुमारास पावसाचा जोर थांबणार असला तरीही ४ वाजेच्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल.
या सामन्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी नव्हे तर पाचही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे हा कसोटी सामना रद्द होण्याचा अंदाज दिला जात आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…