सलमान खानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. बिश्नोई गँगकडूनच अभिनेता सलमान खानला मागच्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने सलमान खानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.त्याच्या घरापासून फार्म हाऊसपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


सलमान खानला यापूर्वी वाय प्लस श्रेणी सुरक्षा देण्यात आली होती, जी आता अपग्रेड करण्यात आली आहे. सलमान खानच्या सुरक्षेत आता पोलिसांच्या एस्कॉर्ट कारचा समावेश करण्यात आला आहे. जेव्हा सलमान घराबाहेर पडेल त्यावेळी ही कार त्याच्यासोबत असेल.


सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.त्याच्या घराबाहेर पोलीस कडेकोट बंदोबस्तामध्ये आहेत. माध्यमांनाही त्याच्या घराजवळ परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सलमानच्या पनवेल फार्म हाऊसची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.फार्म हाऊसच्या आत आणि बाहेर पोलीस तैनात करण्यात आली आहे. याशिवाय या फार्म हाऊसकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी