Raju Shetty : राजू शेट्टींची मोठी उडी; स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार!

बेळगाव : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) कोणत्याही राजकीय पक्षाशी हातमिळवणी करणार नाही, तर स्वतंत्रपणे सर्व जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले. याबाबत नियोजन सुरू असून लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.


महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे धोरण एकच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘परिवर्तन महाशक्ती’च्या नावाखाली राज्यातील छोटे पक्ष एकत्रित करून संघटना बळकट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असणाऱ्या नेत्याची हत्या केली जात असेल तर सर्वसामान्यांचे रक्षण हे सरकार काय करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

Pune Saras Baug : पुणेकरांच्या उत्साहाला गालबोट; सारस बागेत वादाचे रूपांतर हाणामारीत, पोलिसांची तातडीने मध्यस्थी

पुणे : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या धमक्यांमुळे यंदा चर्चेत असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग दिवाळी पाडवा

नागपुरात फटाक्यांचा 'धुमाकूळ'! रात्रभरात सहा ठिकाणी आगीच्या घटना; मोठे नुकसान

नागपूर: दिवाळीच्या दिवसांत नागपुरात फटाक्यांची आतषबाजी आणि निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीच्या घटनांनी मोठी

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये