Heavy Rain! पुणे-मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे : राज्यात मान्सूनचा परतीचा पाऊस चांगलाच झोडपतो (Heavy Rain) आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. मागील आठवड्यापासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. आणखीही काही दिवस असेच जोरदार पावसाची शक्यता (Rain Alert) हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


पुढील २४ तासांत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अन्य भागांतही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आजही काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या पुणे शहरासह नाशिक, नगर, पु्णे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.


पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे.


नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ आणि राज्यातील अन्य भागांत येत्या एक ते दोन दिवसांत पावसाची शक्यता आहे. यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे. या काळात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार