Mission Maharashtra : भाजपाचे आता ‘मिशन महाराष्ट्र’

खास प्लॅनमध्ये ‘या’ ३० जागांवर देणार विशेष लक्ष


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देणार रणनीतीला अंतिम रुप


नवी दिल्ली : हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उभे केलेले मोठे आव्हान मोडून काढत विजय मिळवल्यानंतर भाजपाने (BJP Mission) आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर आपले लक्ष (Mission Maharashtra) केंद्रीत केले आहे. हरयाणामध्ये विजय निश्चित मानणाऱ्या काँग्रेसला निकालांमधून जबर धक्का बसला होता. महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत भाजपाने खास रणनीती आखली आहे. या रणनीतीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वत: लक्ष ठेवून आहेत. या रणनीतीअंतर्गत पुणे, मुंबई व विदर्भावर खास लक्ष देण्यात येत आहे.


पुणे, मुंबई आणि विदर्भातील ३० हून अधिक जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद आहेत. या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा सर्वात आधी करण्यात येणार आहे. येथे अधिक बलाढ्य उमेदवार उतरवण्याची अमित शहा यांची योजना आहे. त्यात मुंबईमधील ६, पुण्यातील ३ आणि विदर्भातील ५ जागांची समावेश आहे. मुंबईतील अल्पसंख्याक समाजाचा वरचष्मा असलेल्या ६ जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गट या दोघांकडूनही दावेदारी केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. त्याचा फायदा उचलण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे.


बंडखोरांची समजूत काढण्यासाठी खास रणनीती


हरयाणामधील निकालांनंतर महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराबाबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून फिडबॅक घेण्यात येत आहे. महायुतीमधून या ठिकाणी बंडखोरी होऊ नये यासाठी ज्येष्ठ नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मराठा समाज व ओबीसींमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी, बंडखोर उमेदवारांची समजूत घालण्यासाठी खास रणनीती आखण्यात येत आहे.


नॉन क्रिमी लेअरची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे रवाना


महायुतीच्या जागावाटपामध्ये ओबीसी आणि मराठा समाजादरम्यान ताळमेळ बसवला जाईल. दोन्ही समाजातील लोकांना समान प्रमाणात तिकीटे दिली जातील. तिकीट वाटपाच्या फॉर्म्युल्याला जवळपास अंतिम रूप दिले गेले आहे. स्वत: अमित शहा हे याबाबतच्या रणनीतीला अंतिम रूप देत आहेत. एवढेच नाही तर ओबीसींसाठीची नॉन क्रिमी लेअरची मर्यादा वाढवण्याचा निर्णयही राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसा प्रस्तावर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची

Venkateshwara Swami Temple : हादरवणारी दुर्घटना! व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम (Srikakulam) जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. येथील व्यंकटेश्वर

सिक्कीममध्ये हिमवृष्टी! झारखंड आणि उत्तर बंगालमध्ये अतीवृष्टी होण्याची शक्यता, खराब वातावरणामुळे अर्थमंत्र्यांनी रद्द केला भूतान दौरा

सिक्कीम: भारत-चीन सीमेवर झालेल्या मुसळधार हिमवृष्टीमुळे सिक्कीममधील तापमानात मोठी घट झाली आहे. हिमवृष्टीमुळे

'शीशमहल' वाद आता चंदीगडमध्ये! भाजप-आपमध्ये तुफान जुंपली; स्वाती मालीवाल यांनीही केली केजरीवालांवर टीका

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) आता 'आप'चे (AAP) संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी चंदीगडमध्ये 'शीशमहल' (Sheesh Mahal)

Beaver Moon : खगोलप्रेमींनो तयारी करा! सुपरमून पृथ्वीच्या २८,००० किमी जवळ येणार; 'या' तारखेला पाहा हा अद्भुत नजारा!

खगोलप्रेमींसाठी (Astronomy Enthusiasts) या नोव्हेंबर महिन्यात एक आनंदाची आणि खास खगोलीय घटना घडणार आहे. या महिन्यातील