Ratan Tata : रतन टाटा यांच्या निधनामुळे जगभरात हळहळ! अनेक सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.


अजय देवगणने सोशल मीडियावर भारतरत्न हरवल्याबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, “एका दूरदृष्ट्या हरवल्याबद्दल जग शोक करत आहे. रतन टाटा यांचा वारसा पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. भारत आणि त्यापलीकडे त्यांचे योगदान अतुलनीय आहे. आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. शांतपणे विश्रांती घ्या सर."





रितेश देशमुखने लिहिले की, “श्री #RatanTata जी राहिले नाहीत हे जाणून खूप दुःख झाले. कुटुंब आणि प्रियजनांना शोक. रेस्ट इन ग्लोरी सर.”





बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवालने रतन टाटा यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'ते म्हणतात तुम्ही गेलात. पण, हे नुकसान भरुन काढणं अशक्य आहे. खूप कठीण आहे", असे कॅप्शन तिने पोस्टमध्ये लिहलं आहे.




प्रियांका चोप्रा जोनासने लिहिले, “तुमच्या दयाळूपणामुळे तुम्ही लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श केलात. तुमच्या नेतृत्वाचा आणि आदराचार्याचा वारसा पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तुम्ही आपल्या देशासाठी जे काही केले त्याबद्दल तुमच्या अतुलनीय उत्कटतेबद्दल आणि समर्पणाबद्दल धन्यवाद. तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात आणि तुमची खूप आठवण येईल, सर.”




 रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच खूप दुःख झाले आहे. अभिनेता संजय दत्तने लिहिले की, “भारताने आज एक खरा दूरदर्शी गमावला आहे. ते सचोटीचे आणि करुणेचे दीपस्तंभ होते ज्यांचे योगदान व्यवसायाच्या पलीकडे होते ज्याचा असंख्य जीवनांवर परिणाम झाला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.”




 अभिनेता वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रतन टाटा यांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “RIP sir RATAN TATA.”





अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले, “श्री रतन टाटाजींच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख होतय. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीतून त्यांनी अखंडता, कृपा आणि प्रतिष्ठा या मूल्यांचे समर्थन केले आणि ते खरोखरच भारताचे प्रतीक आणि ताज होते. आरआयपी सर, तुम्ही अनेक जीवनांना स्पर्श केला आहे.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "