Ratan Tata : रतन टाटा यांच्या निधनामुळे जगभरात हळहळ! अनेक सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.


अजय देवगणने सोशल मीडियावर भारतरत्न हरवल्याबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, “एका दूरदृष्ट्या हरवल्याबद्दल जग शोक करत आहे. रतन टाटा यांचा वारसा पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. भारत आणि त्यापलीकडे त्यांचे योगदान अतुलनीय आहे. आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. शांतपणे विश्रांती घ्या सर."





रितेश देशमुखने लिहिले की, “श्री #RatanTata जी राहिले नाहीत हे जाणून खूप दुःख झाले. कुटुंब आणि प्रियजनांना शोक. रेस्ट इन ग्लोरी सर.”





बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवालने रतन टाटा यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'ते म्हणतात तुम्ही गेलात. पण, हे नुकसान भरुन काढणं अशक्य आहे. खूप कठीण आहे", असे कॅप्शन तिने पोस्टमध्ये लिहलं आहे.




प्रियांका चोप्रा जोनासने लिहिले, “तुमच्या दयाळूपणामुळे तुम्ही लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श केलात. तुमच्या नेतृत्वाचा आणि आदराचार्याचा वारसा पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तुम्ही आपल्या देशासाठी जे काही केले त्याबद्दल तुमच्या अतुलनीय उत्कटतेबद्दल आणि समर्पणाबद्दल धन्यवाद. तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात आणि तुमची खूप आठवण येईल, सर.”




 रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच खूप दुःख झाले आहे. अभिनेता संजय दत्तने लिहिले की, “भारताने आज एक खरा दूरदर्शी गमावला आहे. ते सचोटीचे आणि करुणेचे दीपस्तंभ होते ज्यांचे योगदान व्यवसायाच्या पलीकडे होते ज्याचा असंख्य जीवनांवर परिणाम झाला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.”




 अभिनेता वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रतन टाटा यांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “RIP sir RATAN TATA.”





अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले, “श्री रतन टाटाजींच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख होतय. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीतून त्यांनी अखंडता, कृपा आणि प्रतिष्ठा या मूल्यांचे समर्थन केले आणि ते खरोखरच भारताचे प्रतीक आणि ताज होते. आरआयपी सर, तुम्ही अनेक जीवनांना स्पर्श केला आहे.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व