Ratan Tata : रतन टाटा यांच्या निधनामुळे जगभरात हळहळ! अनेक सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.


अजय देवगणने सोशल मीडियावर भारतरत्न हरवल्याबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, “एका दूरदृष्ट्या हरवल्याबद्दल जग शोक करत आहे. रतन टाटा यांचा वारसा पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. भारत आणि त्यापलीकडे त्यांचे योगदान अतुलनीय आहे. आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. शांतपणे विश्रांती घ्या सर."





रितेश देशमुखने लिहिले की, “श्री #RatanTata जी राहिले नाहीत हे जाणून खूप दुःख झाले. कुटुंब आणि प्रियजनांना शोक. रेस्ट इन ग्लोरी सर.”





बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवालने रतन टाटा यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'ते म्हणतात तुम्ही गेलात. पण, हे नुकसान भरुन काढणं अशक्य आहे. खूप कठीण आहे", असे कॅप्शन तिने पोस्टमध्ये लिहलं आहे.




प्रियांका चोप्रा जोनासने लिहिले, “तुमच्या दयाळूपणामुळे तुम्ही लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श केलात. तुमच्या नेतृत्वाचा आणि आदराचार्याचा वारसा पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तुम्ही आपल्या देशासाठी जे काही केले त्याबद्दल तुमच्या अतुलनीय उत्कटतेबद्दल आणि समर्पणाबद्दल धन्यवाद. तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात आणि तुमची खूप आठवण येईल, सर.”




 रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच खूप दुःख झाले आहे. अभिनेता संजय दत्तने लिहिले की, “भारताने आज एक खरा दूरदर्शी गमावला आहे. ते सचोटीचे आणि करुणेचे दीपस्तंभ होते ज्यांचे योगदान व्यवसायाच्या पलीकडे होते ज्याचा असंख्य जीवनांवर परिणाम झाला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.”




 अभिनेता वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रतन टाटा यांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “RIP sir RATAN TATA.”





अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले, “श्री रतन टाटाजींच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख होतय. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीतून त्यांनी अखंडता, कृपा आणि प्रतिष्ठा या मूल्यांचे समर्थन केले आणि ते खरोखरच भारताचे प्रतीक आणि ताज होते. आरआयपी सर, तुम्ही अनेक जीवनांना स्पर्श केला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया