राज्य मंत्रिमंडळाच्या रेकॉर्डब्रेक बैठकीत ८० निर्णय

ओबीसी नॉन क्रिमीलेयरचा उत्पन्न टप्पा १५ लाखांपर्यंत


मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असून पुढील काही दिवसांमध्ये राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत शोक प्रस्ताव मांडला. यावेळी रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा प्रस्ताव यावेळी सर्वानुमते संमत करण्यात आला.


राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणुकीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे (इतर मागास बहुजन कल्याण) तयार करण्यात येणार असून पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे करण्याचा निर्णयासह मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा तसेच राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास ८० निर्णय घेण्यात आले असून काही नव्याने महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये संत गोरोबा कुंभार महामंडळ व कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच, मंत्रिमंडळाची आजची बैठक रेकॉर्ड ब्रेक झाल्याचेही त्यांनी सांगितले.


आजच्या कॅबिनेटमध्ये लेवा पाटील समाज महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे. पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळासही कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तर, ओबीसी नॉन क्रिमीलेयरचा उत्पन्न टप्पा १५ लाखांपर्यंत नेण्यात येत आहे, त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून ते प्रसिद्ध पत्रक रद्द करण्यात आल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.


गुजर, लेवा पाटील समाजासाठी महामंडळ


आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय घेण्यात आला. विशेष करून मराठवाड्यातील समाज आहेत, गुजर समाज, लेवा पाटील समाज आहे, मोठ्या प्रमाणात गुजर समाजात गरिबी आहे. फायदा तोटा हा भाग नाही, पण सामान्य लोकांना याचा फायदा होईल. एक चांगला निर्णय शासनाने घेतला आहे. कोणाला खुश करण्यासाठी नाही, तर वस्तुस्थिती पाहून लेवा पाटील समाज महामंडळ स्थापन करण्यात आले असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.


उद्योग भवनला रतन टाटा यांचे नाव


उद्योगपती रतन टाटा यांना जो उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला होता, तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, मुंबई येथे जे उद्योग भवन बनत आहे, त्यालाही रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. नवीन उद्योग भवनला त्यांचे नाव देऊन एक प्रकारे शासकीय श्रद्धांजली वाहण्यात आली असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Pune LPG Cylinder Blast : पुण्यात एलपीजी सिलेंडरचा स्फोट! खराडीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

पुणे : शहरातील खराडी परिसरातील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी इमारतीत शुक्रवारी सकाळी झालेल्या LPG Cylinder Blast मुळे

Pune Crime:  घर आवरताना उघड झाला धक्कादायक प्रकार; पुण्यात महिलेचे ११ लाखांचे दागिने गायब

पुणे: पुण्यातील (Pune Crime) एका कुटुंबाला घरातील वस्तू आवरताना मोठा धक्का बसला आहे. कपाटातील दागिने तपासताना लाखो

Akanksha Chaturvedi Sucide : पेपरफुटीचा मानसिक धक्का; नागपुरातील NEET विद्यार्थिनीने संपवले आयुष्य

नागपूर : NEET परीक्षा पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणामुळे नागपुरातील १८ वर्षीय विद्यार्थिनी आकांक्षा ऊर्फ स्नेहा

Kolhapur Accident : मुंबईला जाण्यासाठी निघाले पण त्याआधीच घडला भयंकर अपघात; एका क्षणात संपलं चौघांचं कुटुंब!

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Accident) जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक भीषण रस्ता अपघात (Road Accident) झाला. या अपघातात एकाच

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना