मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी मंत्रालयात जाऊन जोरदार आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. दरम्यान पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलकांना बाहेर काढले आहे. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा द्यावा आणि आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाकडून केली जाते आहे. त्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणी उपोषणदेखील सुरू आहे. मात्र, राज्य सरकार आपल्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही, असा आरोप या आंदोलकांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी आज थेट मंत्रालयात पोहोचून आपल्या मागण्याचे निवेदन सरकारला देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार आपले निवेदन स्वीकारत नाही, असा आरोप करत त्यांनी मंत्रायलात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी या सुरक्षा जाळीवर उतरून आंदोलकांना बाहेर काढलं. यावेळी या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. या आंदोलकांना आता घेण्यात आल्याची माहिती आहे.
धनगर आरक्षणाचा मुद्दा तापत चालला आहे. मंगळवारी आंदोलकांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या घेतल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
धनगर बांधवांनी वर्षा निवासस्थानासमोर घोषणाबाजी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. सरकारने धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जीआर तात्काळ काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
वर्षा निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या धनगर बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे वर्षा निवासस्थानी जाणार आहेत. धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…