सिन्नरच्या टोल प्लाझा कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेत प्रवेश

आमदार नितेश राणे यांना न्यायासाठी साकडे


नाशिक : नाशिक सिन्नर येथील टोल प्लाझाच्या सर्व कर्मचारी वर्गाने आमदार नितेश राणे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेत प्रवेश केला. संघटना सरचिटणीस प्रवीण नलावडे यांनी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातुन संघटना कार्यान्वित झाल्याचे पत्र व्यवस्थापनास दिल्यानंतर कामगार संघटना फलकाचे औपचारिक उद्घाटन संघटना उपाध्यक्ष बाळा कसालकर यांच्या हस्ते करण्यात आले.


व्यवस्थापन अधिकारी दीपक वैद्य, नवनाथ केदार यांची भेट घेऊन कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि व्यवस्थापना कडून होणारी कामगारांची पिळवणूक यावर व्यवस्थापणाला निवेदन देण्यात आले. येत्या दहा दिवसात यावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापणास वेळ देण्यात आली आणि कामगारांच्या समस्या न सोडवल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सदर कार्यक्रमास नाशिक विभागाचे उपचिटणीस दिगंबर गायकवाड श्री योगेश धामणसकर श्री रणजीत पाटील स्थानिक युनिट कमिटी सदस्य श्री राम तांबोळे रोहन मोरे सागर मोजाड स्वप्नील साबळे नितीन ताजनपुरे गणेश झाडे महेश तुंगार आणि कार्यकारणी सदस्य अंकेश गुप्ता हे उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी