सिन्नरच्या टोल प्लाझा कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेत प्रवेश

आमदार नितेश राणे यांना न्यायासाठी साकडे


नाशिक : नाशिक सिन्नर येथील टोल प्लाझाच्या सर्व कर्मचारी वर्गाने आमदार नितेश राणे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेत प्रवेश केला. संघटना सरचिटणीस प्रवीण नलावडे यांनी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातुन संघटना कार्यान्वित झाल्याचे पत्र व्यवस्थापनास दिल्यानंतर कामगार संघटना फलकाचे औपचारिक उद्घाटन संघटना उपाध्यक्ष बाळा कसालकर यांच्या हस्ते करण्यात आले.


व्यवस्थापन अधिकारी दीपक वैद्य, नवनाथ केदार यांची भेट घेऊन कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि व्यवस्थापना कडून होणारी कामगारांची पिळवणूक यावर व्यवस्थापणाला निवेदन देण्यात आले. येत्या दहा दिवसात यावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापणास वेळ देण्यात आली आणि कामगारांच्या समस्या न सोडवल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सदर कार्यक्रमास नाशिक विभागाचे उपचिटणीस दिगंबर गायकवाड श्री योगेश धामणसकर श्री रणजीत पाटील स्थानिक युनिट कमिटी सदस्य श्री राम तांबोळे रोहन मोरे सागर मोजाड स्वप्नील साबळे नितीन ताजनपुरे गणेश झाडे महेश तुंगार आणि कार्यकारणी सदस्य अंकेश गुप्ता हे उपस्थित होते.

Comments
Add Comment

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

Anil Ambani ED Case | अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत; EDकडून आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम

Operation Sagar Bandhu | ‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे