Mumbai Goa Highway : पाबळ खोरे संघर्ष समितीच्या माध्यमातून मंगळवारी रास्ता रोको!

उड्डाणपुलाच्या गाळ्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक होणार ठप्प


अलिबाग : मुंबई-गोवा (Mumbai Goa Highway) राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटी गावाजवळ उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचा गाळा कमी रुंदीचा ठेवल्याने त्यातून पाबळ भागात जाणारी एसटी सेवा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याविरोधात पाबळ खोरे संघर्ष समितीच्या माध्यमातून ८ ऑक्टोबरला रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती पाबळ खोरे संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण शिवकर यांनी दिली. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होणार आहे.


मुंबई-गोवा महामार्गावरील कोलेटी येथे असणारा कमी उंचीचा अरुंद असणाऱ्या पुलाची तक्रार येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा केली आहे. यासंदर्भात २० दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांच्या सोबत संबंधित अधिकाऱ्यांचा दौराही झाला. त्यावेळी लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खासदार तटकरे यांनी पुलाची उंची व रुंदी याबाबत फेरविचार करण्याच्या सुचना देऊनही या रस्त्याचे व पुलाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सर हे काम चालू ठेवल्याचा आरोप या निमीत्ताने ग्रामस्थांनी केला आहे.


महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या पुलाची उंची कमी करून त्याचा पाया कमी केल्याने दर पावसाळ्यात या गाळ्यात पुराचे पाणी शिरणार आहे. दर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नागोठण्यानंतर अंबा नदीचे पाणी या गावात शिरते. याची पूर्वकल्पना येथील ज्येष्ठ शेतकऱ्यांनी देऊनही अधिकाऱ्यांनी येथील भौगोलिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता, आपली मनमानी सुरु ठेवली असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा