CM Eknath Shinde : चेंबूरच्या सिद्धार्थनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत!

मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटना स्थळाची पाहणी; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश


मुंबई : चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील (Chembur Fire) मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.


मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला.


दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच मुंबई महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

भविष्यातील मुंबईसाठी ४८ हजार कोटींचा 'पाया'!

'एमएमआरडीए'चा अर्थसंकल्प सादर; मेट्रो, भुयारी मार्ग आणि 'मुंबई ३.०'वर भर, ८७ टक्के तरतूद पायाभूत

एमएमआरडीएचा २०१७–१८ नंतर प्रथमच अधिशेष अर्थसंकल्प

₹४८,०७२.५७ कोटींच्या आराखड्यामुळे आर्थिक परिवर्तनाचा नवा टप्पा आणि पायाभूत सुविधांना गती प्रकल्पांसाठी ८७%

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प!

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली आहे. हे

प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार; मंत्री मंगलप्रभात लोढा

याबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजय कुमार यांची घेतली भेट मुंबई

पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये मुंबई : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन

ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी; मंत्री भरत गोगावले यांचे विधान 

'सक्षम २०२५-२६' अभियानाचा समारोप मुंबई : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण