बाईईईई! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमधील रतलाममध्ये मालगाडीचे २ डबे रुळावरून घसरले. मालगाडीत खूप डिझेल भरलं होतं, ही गोष्ट आजूबाजूच्या लोकांना कळताच ते आपल्या घरातून बादल्या, कॅन आणि मिळेल ती वस्तू घेऊन डिझेल भरण्यासाठी आले. डिझेलसाठी लोकांची झुंबड उडाली. यावेळी तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्यांच्याकडे बघतच राहिले आणि डिझेलची लूट ही सुरूच होती.


ही मालगाडी बडोद्याहून भोपाळला जात होती. याच दरम्यान मालगाडीचे दोन डबे रतलामजवळ रुळावरून घसरले. सुदैवाने मोठा अपघात टळला जरी असला तरी मालगाडीचे डबे डिझेलने भरल्याचं समजताच लोक घरातून बादल्या आणि कॅन घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी गेले. लोकांनी बादल्या आणि कॅनमधून डिझेल नेलं. काही लोकांनी तर याचे व्हिडिओही बनवले आहेत जे आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.


https://x.com/Nitinreporter5/status/1842193760865972670

रेल्वे वाहतूक विस्कळीत


तब्बल १२ तासांहून अधिक काळ रेल्वे सेवा या घटनेनंतर प्रभावित झाली होती. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी खेमराज मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दिल्ली मुंबई मार्गावर झाला. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मीणा यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे १२ तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. आजकाल गाड्या रुळावरून घसरल्याच्या अनेक घटना देशभरात समोर येत आहेत.


Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत