Accident News : भीषण अपघात! उत्तरप्रदेशात ट्रकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

मिर्झापूर : उत्तरप्रदेशच्या (Uttarpradesh) मिर्झापूर जिल्ह्यातून भीषण अपघात (Accident News) झाल्याची बातमी समोर आली आहे. काल रात्री उशिरा जीटी रोडवरील कटका गावाजवळ ट्रकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू झाला. या ट्रकने भदोही जिल्ह्यातून बनारसला जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. जोरदार झालेल्या धडकेमुळे या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १ वाजेच्या सुमारास मिर्झा मुराद कांचवा सीमेवर रस्ता अपघात झाल्याची माहिती मिळाली. भदोही जिल्ह्यातून १३ जणांना घेऊन बनारसला जात असलेल्या ट्रॅक्टरला एका अनियंत्रित ट्रकने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टरमधील १३ जणांपैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या तिघांनाही उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे