Railway Employees Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी होणार दणक्यात साजरी; मिळणार दुप्पट बोनस!

नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees) आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरु असून पुढच्या महिन्यात दिवाळी (Diwali) सण येणार आहे. या सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून विविध भेटवस्तूंसह बोनस (Bonus) दिला जातो. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA)सरकारने नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे.


काल पार पडलेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी २,०२९ कोटी रुपयांच्या उत्पादकतेशी संबंधित बोनस योजनेला केंद्राने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा जवळपास १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी एकदम दणक्यात साजरी होणार आहे.



नेमकं कोणाला मिळणार बोनस?


रेल्वे विभागात वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारच्या घोषणेअंतर्गत बोनस मिळणार आहे. ट्रॅक मेन्टेनर्स, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर्स (गार्ड्स), स्टेशन मास्तर, सुपरवायजर्स, टेक्निशियन हेल्पर, पॉइंट्समन, मिनिस्टेरियल स्टाफ अशा अनेक कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे.

Comments
Add Comment

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे