Railway Employees Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी होणार दणक्यात साजरी; मिळणार दुप्पट बोनस!

नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees) आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरु असून पुढच्या महिन्यात दिवाळी (Diwali) सण येणार आहे. या सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून विविध भेटवस्तूंसह बोनस (Bonus) दिला जातो. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA)सरकारने नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे.


काल पार पडलेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी २,०२९ कोटी रुपयांच्या उत्पादकतेशी संबंधित बोनस योजनेला केंद्राने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा जवळपास १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी एकदम दणक्यात साजरी होणार आहे.



नेमकं कोणाला मिळणार बोनस?


रेल्वे विभागात वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारच्या घोषणेअंतर्गत बोनस मिळणार आहे. ट्रॅक मेन्टेनर्स, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर्स (गार्ड्स), स्टेशन मास्तर, सुपरवायजर्स, टेक्निशियन हेल्पर, पॉइंट्समन, मिनिस्टेरियल स्टाफ अशा अनेक कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे.

Comments
Add Comment

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न