Harshvardhan Patil : अखेर हर्षवर्धन पाटलांनी फुंकली तुतारी!

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच आज भाजपामधील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.


इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार नसल्याने हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, काल शरद पवार यांची आणि माझी सिल्वर ओकला बैठक झाली. त्यामध्ये शरद पवार मला म्हणाले इंदापूरमधील अनेक लोकांचे मत आहे की तुम्ही निवडणूक लढवा. त्यामुळे तुमच्या लोकांशी चर्चा करुन तुम्ही निर्णय घ्या, त्या पुढची जबाबदारी माझी, असे पवार आपल्याला म्हणाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, शरद पवार यांच्याशी चर्चेअगोदर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली आहे. त्या चर्चेत फडणवीस यांनी आपली अडचण समजून घ्या, असे म्हटल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ