'सर्वांची योजना, सर्वाचा विकास' मोहिमेंतर्गत ग्रामदान मंडळ जामसर येथे विशेष ग्रामसभा संपन्न

जव्हार(मनोज कामडी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जव्हार तालुक्यातील ग्रामदान मंडळ जामसर व पिरामल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पंचायतींराज विभागाच्या निर्देशांनुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. पंचायतीराज विभागाच्या निर्देशांनुसार आयोजित विशेष ग्रामसभेत ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना विशेष निमंत्रित करून त्याचा संविधान उद्देशिका व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे आतापर्यंतचे अनुभव सांगण्याची विशेष संधी देण्यात आली.


सदर कार्यक्रमाची सुरवात ग्रामदान मंडळ अध्यक्ष विठठल थेतले ,उपाध्यक्ष हर्षद राऊत,जिल्हा परिषद सदस्या सुरेखा थेतले, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मनोहर उमतोल, ग्रामपंचायत अधिकारी सुनील भोये, व पिरामल फाऊंडेशनच्या कार्यक्रम प्रमुख वंदना मौर्य, पंचायत समिती सदस्य, व ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक ,आदिवासी सेवक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. महात्मा गांधीजीं आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विशेष ग्रामसभेचे उद्दिष्टे व महत्व यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.


ग्रामविकास योजनाच्या निर्मितीत ग्रामस्थांची भूमिका या विषयावर गांधी फेलो सिम्पी, पृथ्वी, रुक्सार, अमन, सुरेश आणि करुणा फेलो वैशाली आणि छाया यांनी संयुक्तपणे गाव विकास आराखडा तयार करण्यात गावकऱ्यांच्या भूमिकेवर आपले विचार मांडले.पण शाळांमध्ये पुरेसे शिक्षक, हॉस्पिटलमध्ये पुरेसे डॉक्टर्स आणि रस्त्यांवर वाहतुकीची सुरळीत व्यवस्था असेल, तर खूप सोयीचे होईल.असे मत मांडले.


यावेळी सभेतील उपस्थितांनी नशामुक्त गाव व स्वच्छतेची शपथ घेतली.तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माझ्या आईच्या नावाने एक झाड अभियानाअंतर्गत फळझाडे लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी सुनील भोये यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका , जेएसडब्ल्यू स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये