'सर्वांची योजना, सर्वाचा विकास' मोहिमेंतर्गत ग्रामदान मंडळ जामसर येथे विशेष ग्रामसभा संपन्न

  107

जव्हार(मनोज कामडी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जव्हार तालुक्यातील ग्रामदान मंडळ जामसर व पिरामल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पंचायतींराज विभागाच्या निर्देशांनुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. पंचायतीराज विभागाच्या निर्देशांनुसार आयोजित विशेष ग्रामसभेत ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना विशेष निमंत्रित करून त्याचा संविधान उद्देशिका व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे आतापर्यंतचे अनुभव सांगण्याची विशेष संधी देण्यात आली.


सदर कार्यक्रमाची सुरवात ग्रामदान मंडळ अध्यक्ष विठठल थेतले ,उपाध्यक्ष हर्षद राऊत,जिल्हा परिषद सदस्या सुरेखा थेतले, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मनोहर उमतोल, ग्रामपंचायत अधिकारी सुनील भोये, व पिरामल फाऊंडेशनच्या कार्यक्रम प्रमुख वंदना मौर्य, पंचायत समिती सदस्य, व ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक ,आदिवासी सेवक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. महात्मा गांधीजीं आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विशेष ग्रामसभेचे उद्दिष्टे व महत्व यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.


ग्रामविकास योजनाच्या निर्मितीत ग्रामस्थांची भूमिका या विषयावर गांधी फेलो सिम्पी, पृथ्वी, रुक्सार, अमन, सुरेश आणि करुणा फेलो वैशाली आणि छाया यांनी संयुक्तपणे गाव विकास आराखडा तयार करण्यात गावकऱ्यांच्या भूमिकेवर आपले विचार मांडले.पण शाळांमध्ये पुरेसे शिक्षक, हॉस्पिटलमध्ये पुरेसे डॉक्टर्स आणि रस्त्यांवर वाहतुकीची सुरळीत व्यवस्था असेल, तर खूप सोयीचे होईल.असे मत मांडले.


यावेळी सभेतील उपस्थितांनी नशामुक्त गाव व स्वच्छतेची शपथ घेतली.तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माझ्या आईच्या नावाने एक झाड अभियानाअंतर्गत फळझाडे लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी सुनील भोये यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका , जेएसडब्ल्यू स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना