IND vs BAN: १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भारताने बनवला हा रेकॉर्ड

Share

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळवण्यात आलेला सामना अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला ७ विकेटनी हरवले. पहिल्या तीन दिवशी मुसळधार पावसामुळे वाया गेले. मात्र शेवटच्या २ दिवसांत भारताने असा खेळ केला की कानपूरमध्ये एखादा कसोटी सामना खेळवला जात असे वाटलेच नाही. आता भारत असा पहिला देश बनला आहे ज्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणतेही मेडन ओव्हर न खेळता विजय मिळवला.

दोन्ही डावांत नाही खेळली मेडन ओव्हर

क्रिकेटमध्ये असे आधीही घडले आहे की जेव्हा एखाद्या संघाने मेडन ओव्हर खेळता सामना जिंकण्याची कामगिरी केली. १९३९ मध्ये डरबनमध्ये खेळवण्यात आलेल्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात असे घडले होते. इंग्लंडने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आणि इंग्लंडच्या फलंदाजांनी एकही मेडन ओव्हर टाकायला दिली नव्हती. हा साना इंग्लंडने एक डाव आणि १३ धावांनी जिंकला होता.

त्या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात बॅटिंग केली नव्हती. यामुळे भारत असा पहिला देश बनला आहे ज्यांनी दोन्ही डावांत मेडन ओव्हर न टाकता कसोटी सामना जिंकला आहे. बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला होता. तर सामन्यांच्या पहिल्या ३ दिवसांत पाऊस झाला होता. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने जोरदार बॅटिंग केली आणि ३४.४ षटकांत २८५ धावा केल्या होत्या.तर दुसऱ्या डावात भारताला ९५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने हे आव्हान १७.२ षटकांत पूर्ण केले होते.

Recent Posts

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

1 hour ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

3 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

3 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

3 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

3 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

4 hours ago