IND vs BAN: १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भारताने बनवला हा रेकॉर्ड

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळवण्यात आलेला सामना अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला ७ विकेटनी हरवले. पहिल्या तीन दिवशी मुसळधार पावसामुळे वाया गेले. मात्र शेवटच्या २ दिवसांत भारताने असा खेळ केला की कानपूरमध्ये एखादा कसोटी सामना खेळवला जात असे वाटलेच नाही. आता भारत असा पहिला देश बनला आहे ज्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणतेही मेडन ओव्हर न खेळता विजय मिळवला.



दोन्ही डावांत नाही खेळली मेडन ओव्हर


क्रिकेटमध्ये असे आधीही घडले आहे की जेव्हा एखाद्या संघाने मेडन ओव्हर खेळता सामना जिंकण्याची कामगिरी केली. १९३९ मध्ये डरबनमध्ये खेळवण्यात आलेल्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात असे घडले होते. इंग्लंडने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आणि इंग्लंडच्या फलंदाजांनी एकही मेडन ओव्हर टाकायला दिली नव्हती. हा साना इंग्लंडने एक डाव आणि १३ धावांनी जिंकला होता.


त्या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात बॅटिंग केली नव्हती. यामुळे भारत असा पहिला देश बनला आहे ज्यांनी दोन्ही डावांत मेडन ओव्हर न टाकता कसोटी सामना जिंकला आहे. बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला होता. तर सामन्यांच्या पहिल्या ३ दिवसांत पाऊस झाला होता. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने जोरदार बॅटिंग केली आणि ३४.४ षटकांत २८५ धावा केल्या होत्या.तर दुसऱ्या डावात भारताला ९५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने हे आव्हान १७.२ षटकांत पूर्ण केले होते.

Comments
Add Comment

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘ मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील