LPG Cylinder: सणासुदीआधी गॅस सिलेंडर महागला, इतक्या रुपयांची वाढ

मुंबई: ऑक्टोबर महिना हा सणासुदींचा महिना असतो. या महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांची रेलचेल आहे. दरम्यान, या सणासुदीच्या महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. गॅस किंमतीमध्ये ही वाढ १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल सिलेंडरमध्ये झाली असून ४८.५० रूपये प्रति सिलेंडर झाली आहे. एलपीजी सिलेंडरचे नवे दर आज १ ऑक्टोबर २०२४ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत.


देशाची राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर आता १७४० रूपये झाले आहेत. यात ४८.५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात हे भाव १६९१.५० रूपये इतके होते.


कोलकातामध्ये १९ किग्रॅमच्या सिलेंडरचे दर आता १८५०.५० रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात हे दर १८०२.५० रूपये इतके होते.


मुंबईत एलपीजी सिलेंडरचे दर आता १६९२ रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात हे दर १६४४ रूपये होते.


चेन्नईत १९ किग्रॅच्या सिलेंडरचे दर आता १९०३ रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात हे दर १८५५ रूपये होते.


दरम्यान, सामान्य गृहिणी वापरत असलेल्या १४.२ किग्रॅ वजनाच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे