LPG Cylinder: सणासुदीआधी गॅस सिलेंडर महागला, इतक्या रुपयांची वाढ

मुंबई: ऑक्टोबर महिना हा सणासुदींचा महिना असतो. या महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांची रेलचेल आहे. दरम्यान, या सणासुदीच्या महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. गॅस किंमतीमध्ये ही वाढ १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल सिलेंडरमध्ये झाली असून ४८.५० रूपये प्रति सिलेंडर झाली आहे. एलपीजी सिलेंडरचे नवे दर आज १ ऑक्टोबर २०२४ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत.


देशाची राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर आता १७४० रूपये झाले आहेत. यात ४८.५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात हे भाव १६९१.५० रूपये इतके होते.


कोलकातामध्ये १९ किग्रॅमच्या सिलेंडरचे दर आता १८५०.५० रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात हे दर १८०२.५० रूपये इतके होते.


मुंबईत एलपीजी सिलेंडरचे दर आता १६९२ रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात हे दर १६४४ रूपये होते.


चेन्नईत १९ किग्रॅच्या सिलेंडरचे दर आता १९०३ रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात हे दर १८५५ रूपये होते.


दरम्यान, सामान्य गृहिणी वापरत असलेल्या १४.२ किग्रॅ वजनाच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Comments
Add Comment

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये 'कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण

सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोग नवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०