मान्सून परतीच्या मार्गावर, तापमानात वाढ

पुणे : परतीच्या प्रवासावर निघालेला मान्सून (monsoon) काही अडथळ्यांमुळे धीम्या गतीने पुढे सरकत आहे. मात्र, सोमवारपासून या प्रवासाला गती मिळत असून, आणखी वेगाने मान्सून परतण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मात्र मान्सून परतीच्या मार्गावर असताना, तापमानात वाढ होत आहे. मात्र यंदा पावसाने समाधानकारक कामगिरी केली आहे.


महाराष्ट्रातील दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी केला गेला आहे. मात्र, कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पाऊस उघडीप देणार असून, काही ठिकाणी हलकी रिमझिम होण्याची शक्यता आहे.



'ऑक्टोबर हिट'चे संकेत


पावसाने विश्रांती घेतल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान वाढत आहे. त्यामुळे 'ऑक्टोबर हिट'च्या सुरुवातीचे संकेत मिळत आहेत. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि बीड या भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पडतील, पण त्यातून कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी भारतात एकूण ९३४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जे सरासरीच्या १०८ टक्के आहे. विशेषत: मध्य भारतात १९ टक्के आणि पूर्व-पूर्वोत्तर भागात १४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जूनमध्ये ११ टक्के कमी पाऊस झाला असला तरी जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे