मान्सून परतीच्या मार्गावर, तापमानात वाढ

  264

पुणे : परतीच्या प्रवासावर निघालेला मान्सून (monsoon) काही अडथळ्यांमुळे धीम्या गतीने पुढे सरकत आहे. मात्र, सोमवारपासून या प्रवासाला गती मिळत असून, आणखी वेगाने मान्सून परतण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मात्र मान्सून परतीच्या मार्गावर असताना, तापमानात वाढ होत आहे. मात्र यंदा पावसाने समाधानकारक कामगिरी केली आहे.


महाराष्ट्रातील दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी केला गेला आहे. मात्र, कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पाऊस उघडीप देणार असून, काही ठिकाणी हलकी रिमझिम होण्याची शक्यता आहे.



'ऑक्टोबर हिट'चे संकेत


पावसाने विश्रांती घेतल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान वाढत आहे. त्यामुळे 'ऑक्टोबर हिट'च्या सुरुवातीचे संकेत मिळत आहेत. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि बीड या भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पडतील, पण त्यातून कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी भारतात एकूण ९३४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जे सरासरीच्या १०८ टक्के आहे. विशेषत: मध्य भारतात १९ टक्के आणि पूर्व-पूर्वोत्तर भागात १४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जूनमध्ये ११ टक्के कमी पाऊस झाला असला तरी जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

Comments
Add Comment

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक