आनंद दिघेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंना संपवण्याचा रचला होता कट

सिडको महामंडळाचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा


छत्रपती संभाजीनगर : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात देखील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यासारखा कट रचला गेला होता, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते आणि सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे.


त्यांनी पुढे म्हटले की महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात नक्षलवाद्यांच्या माध्यमातून शिंदे यांना धमक्या दिल्या जात होत्या आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जावी, अशी पोलिसांची शिफारस असूनही त्यावर सही करण्यात आली नाही.


शिरसाट यांच्या मते, शिंदे यांना मारण्याचा कट रचला गेला होता आणि या कटाचे नेतृत्व त्या काळातील काही वरिष्ठ नेत्यांनी केले होते. शिवसेनेतील काही नेत्यांना एकनाथ शिंदे यांची वाढती ताकद अस्वस्थ करीत होती. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी हा कट आखला गेला असावा, असा शिरसाट यांचा आरोप आहे.


त्याचप्रमाणे शिरसाट यांनी आणखी एक गंभीर दावा केला की, शिवसेना नेते आनंद दिघे यांची हत्या झाली होती, तो केवळ अपघात नव्हता. ठाण्यातील लोकांना याची कल्पना होती, परंतु दिघे यांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना हटवले गेले. दिघे यांचा हृदयविकाराने मृत्यू होणे संशयास्पद होते, कारण त्यांची तब्येत त्या काळात चांगली होती.


या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही शिरसाट यांचे समर्थन केले. त्यांनी आरोप केला की, उद्धव ठाकरे यांनी दिघे यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा मागितला होता. कारण त्यांना आपल्या प्रभावाला धोका वाटत होता. आनंद दिघेंच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये, असेही कदम यांनी स्पष्ट केले.


या आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यामुळे शिवसेना-शिंदे गटातील तणाव अधिक तीव्र झाला आहे.

Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.