आनंद दिघेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंना संपवण्याचा रचला होता कट

Share

सिडको महामंडळाचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा

छत्रपती संभाजीनगर : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात देखील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यासारखा कट रचला गेला होता, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते आणि सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे.

त्यांनी पुढे म्हटले की महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात नक्षलवाद्यांच्या माध्यमातून शिंदे यांना धमक्या दिल्या जात होत्या आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जावी, अशी पोलिसांची शिफारस असूनही त्यावर सही करण्यात आली नाही.

शिरसाट यांच्या मते, शिंदे यांना मारण्याचा कट रचला गेला होता आणि या कटाचे नेतृत्व त्या काळातील काही वरिष्ठ नेत्यांनी केले होते. शिवसेनेतील काही नेत्यांना एकनाथ शिंदे यांची वाढती ताकद अस्वस्थ करीत होती. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी हा कट आखला गेला असावा, असा शिरसाट यांचा आरोप आहे.

त्याचप्रमाणे शिरसाट यांनी आणखी एक गंभीर दावा केला की, शिवसेना नेते आनंद दिघे यांची हत्या झाली होती, तो केवळ अपघात नव्हता. ठाण्यातील लोकांना याची कल्पना होती, परंतु दिघे यांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना हटवले गेले. दिघे यांचा हृदयविकाराने मृत्यू होणे संशयास्पद होते, कारण त्यांची तब्येत त्या काळात चांगली होती.

या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही शिरसाट यांचे समर्थन केले. त्यांनी आरोप केला की, उद्धव ठाकरे यांनी दिघे यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा मागितला होता. कारण त्यांना आपल्या प्रभावाला धोका वाटत होता. आनंद दिघेंच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

या आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यामुळे शिवसेना-शिंदे गटातील तणाव अधिक तीव्र झाला आहे.

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

46 minutes ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

50 minutes ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

2 hours ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago