डोकेदुखी झाल्यास लगेचच पेनकिलर घेता का? हे आहे धोकादायक

मुंबई: डोकेदुखीचा त्रास सतावत असेल तर आणखी चिडचिड होते. अशा स्थितीमध्ये डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी अनेकजण पेनकिलर खातात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की पेनकिलरमुळे शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होताता.



डोकेदुखीचा त्रास झाल्यास लगेचच खाऊ नका पेनकिलर


डॉक्टरांच्या मते डोकेदुखी झाल्यास लगेचच पेनकिलर खाऊ नका. कारण यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. पेनकिलर खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. यामुळे त्रास, सूज तसेच अनेक समस्या उद्भवतात. पोटात अल्सर होण्याचा धोकाही वाढतो. केवळ इतकेच नव्हे तर लिव्हर आणि किडनीलाही धोका असतो. यामुळे इम्युनिटी कमकुवत होते. तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.


डोकेदुखीवर गोळी घेतल्यानंतर लगेचच आराम पडतो मात्र दीर्घकाळासाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डोकेदुखी झाल्यास लगेचच गोळी खाऊ नये.



डोकेदुखीमध्ये लगेचच गोळी खाल्ल्याने हे होते नुकसान


औषधांचा ओव्हरडोस झाल्यास पोटातील नर्व्हस सिस्टीम आणि शरीराच्या इम्युनिटीवर गंभीर परिणाम होतात.


या कारणामुळे पोटाशी संबंधिक समस्या जसे सूज, अपचन होऊ शकते.


डोकेदुखीमध्ये अधिक पेनकिलर खाल्ल्याने लिव्हर आणि किडनीसारख्या अंगांवर परिणाम होतो.


औषधे घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.


डोकेदुखीमध्ये अधिक पेनकिलर खाल्ल्यास हृदयाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे हॉर्ट अॅटॅकचाही धोका वाढतो.


डोकेदुखीनमध्ये जर तुम्ही सातत्याने पेनकिलर खात असाल तर पोटाचा अल्सरही होऊ शकतो.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे