डोकेदुखी झाल्यास लगेचच पेनकिलर घेता का? हे आहे धोकादायक

मुंबई: डोकेदुखीचा त्रास सतावत असेल तर आणखी चिडचिड होते. अशा स्थितीमध्ये डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी अनेकजण पेनकिलर खातात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की पेनकिलरमुळे शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होताता.



डोकेदुखीचा त्रास झाल्यास लगेचच खाऊ नका पेनकिलर


डॉक्टरांच्या मते डोकेदुखी झाल्यास लगेचच पेनकिलर खाऊ नका. कारण यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. पेनकिलर खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. यामुळे त्रास, सूज तसेच अनेक समस्या उद्भवतात. पोटात अल्सर होण्याचा धोकाही वाढतो. केवळ इतकेच नव्हे तर लिव्हर आणि किडनीलाही धोका असतो. यामुळे इम्युनिटी कमकुवत होते. तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.


डोकेदुखीवर गोळी घेतल्यानंतर लगेचच आराम पडतो मात्र दीर्घकाळासाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डोकेदुखी झाल्यास लगेचच गोळी खाऊ नये.



डोकेदुखीमध्ये लगेचच गोळी खाल्ल्याने हे होते नुकसान


औषधांचा ओव्हरडोस झाल्यास पोटातील नर्व्हस सिस्टीम आणि शरीराच्या इम्युनिटीवर गंभीर परिणाम होतात.


या कारणामुळे पोटाशी संबंधिक समस्या जसे सूज, अपचन होऊ शकते.


डोकेदुखीमध्ये अधिक पेनकिलर खाल्ल्याने लिव्हर आणि किडनीसारख्या अंगांवर परिणाम होतो.


औषधे घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.


डोकेदुखीमध्ये अधिक पेनकिलर खाल्ल्यास हृदयाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे हॉर्ट अॅटॅकचाही धोका वाढतो.


डोकेदुखीनमध्ये जर तुम्ही सातत्याने पेनकिलर खात असाल तर पोटाचा अल्सरही होऊ शकतो.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि