Mumbai News : मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटला! पाणीपुरवठा करणारी धरणं काठोकाठ भरली

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर आता परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी असणारे धरणे,नदी-नाले तुडुंब भरले गेले आहेत. तसेच मुंबई शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या सर्व धरणे देखील काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी प्रश्न सुटणार आहे.


मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा १०० टक्क्यांजवळ पोहचला आहे. आज सकाळी ६ वाजता या जलाशयांमधील पाणीसाठा १४,३९,२७१ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच एकूण ९९.४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणीप्रश्न मिटला आहे.



कोणत्या धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा?



  • अप्पर वैतरणा - ९९.७९ टक्के पाणीसाठा

  • मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा

  • तानसा - ९९.५८ टक्के पाणीसाठा

  • मध्य वैतरणा - ९८.७९ टक्के पाणीसाठा

  • भातसा - ९९.३५ टक्के पाणीसाठा

  • विहार - १०० टक्के पाणीसाठा

  • तुलसी - १०० टक्के पाणीसाठा

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा