Devendra Fadnavis : शरद पवार आणि उद्धव ठाकरेच पक्षफुटीला जबाबदार!

मुलीला आणि मुलाला पक्षाचा वारसा द्यायचा या महत्वाकांक्षेने त्यांचा घात केला


मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेच्या लढाईमुळे फुटले आहेत. शरद पवारांना (Sharad Pawar) आपल्या मुलीला (Supriya Sule) आणि उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना मुलाला (Aditya Thackeray) पक्षाचा वारसा द्यायचा या महत्वाकांक्षेने त्यांचा घात केला, असे भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. राज्याच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झालं. त्यानंतरच्या दीड वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. या पक्षातील दोन्ही गट सत्तेत सहभागी झाले. हे दोन्ही पक्ष भाजपानेच फोडले असा आरोप विरोधी पक्षांकडून आजही केला जातो. या आरोपांना आणि दोन्ही पक्ष फुटण्याला नेमकं कोण जबाबदार आहे या प्रश्नाचे उत्तर फडणवीस यांनी दिले. भाजपामुळे राज्यात सहा पक्ष तयार झाले आहेत का? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दांत हे उत्तर दिले.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक काळ असा होता की त्यावेळी काँग्रेसचे लोक म्हणायचे की या सगळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता. अजूनही काही प्रमाणात असं बोललं जात आहेच. पण ते खरं नाही. ज्यांनी आयुष्यभर लोकांचे पक्ष फोडले त्यांचा पक्ष भाजपा कसा काय फोडू शकतो? असा प्रतिसवाल फडणवीस यांनी केला.


खरं तर शरद पवारांचा पक्ष त्यांनीच फोडला. इतकी वर्ष त्यांनी त्यांचा वारसा अजित पवारांकडं दिला होता. नंतर त्यांना वाटलं की आता हा वारसा मुलीला दिला पाहिजे. राजकारणातील घराणेशाहीच्या पक्षांची अवस्था अशीच होत असते. यानंतर अजित पवार यांना वाटलं की आता आपलं राजकारणच संपेल त्यावेळी ते आमच्यासोबत आले, असे फडणवीस म्हणाले.


तर तिकडे उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी आदित्य ठाकरेंच्या हाती शिवसेना देण्याचा प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदेंनाही या (Eknath Shinde) गोष्टीची जाणीव झाली होती की आता ज्या काही तडजोडी चालल्या आहेत त्या आदित्य ठाकरेंसाठी चालल्या आहेत. एकनाथ शिंदेंचं पक्षातलं महत्वं वाढत चाललं होतं. त्यांचं महत्व कमी करून पक्ष आदित्य ठाकरेंच्या हाती सोपवण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळेच शिवसेना फुटली, असे थेट वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Comments
Add Comment

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय