दह्यामध्ये मीठ टाकून खात असाल तर थांबा, होऊ शकते मोठे नुकसान

मुंबई: दही प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे डाएटमध्ये दह्याचा नियमितपणे समावेश करावा. दह्यामध्ये आपल्या पोटासाठी फायदेशीर असलेले बॅक्टेरिया असतात जे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले आणि इम्युनिटी मजबूत राहते.


दह्यामध्ये काही लोक साखर तर काहीजण मीठ घालून खातात. जर तुम्ही दह्यात मीठ टाकून खात असाल तर तुम्ही हे ही जाणून घेणे गरजेचे आहे की असे केल्याने तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकते.


आयुर्वेदानुसार दह्यामध्ये कधीही मीठ घालून खाऊ नये. तुम्ही दह्यामध्ये साखर, गूळ अथवा कोणतीही गोड गोष्ट मिसळू शकता मात्र मीठ घालून खाल्ल्याने त्याचे शरीरास फायदे होत नाहीत.


दह्यामध्ये जर तुम्ही अधिक मीठ टाकून खात असाल तर त्याचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिज्मवर होऊ शकतो. यामुळे दह्यात मीठ घालून खाऊ नये. दह्यामध्ये पोटासाठी फायदेशीर असे लॅक्टोबेसिलस बॅक्टेरिया असतात ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो.


आयुर्वेदानुसार जर आपण दह्यामध्ये मीठ टाकतो तर हे बॅक्टेरिया मरून जातात. त्यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसानच होते. मात्र जर तुम्हाला दही साखरेशिवाय मीठ टाकून खायचे असेल तर साधे अथवा काळे मीठ टाकण्याऐवजी सैंधव मीठ घाला.


आयुर्वेदात हे ही सांगितले आहे की दही नुसतेच खाऊ नये तर दह्यामध्ये साखर, मध अथवा गूळ मिसळून खावे. सोबतच रात्रीच्या वेळेस दही खाऊ नये. दह्यामधील गोडवा आणि आंबटपणा यामुळे त्यात म्युकस निर्माण होऊ शकतात यामुळे श्वासासंबंधी त्रास अथवा आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे