Nitesh Rane : मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर पॉर्नस्टार राहतो!

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेवर साधला निशाणा


मुंबई : बदलापूरमध्ये स्वसंरक्षणामुळे जो एन्काऊंटर (Badlapur Encounter) पोलिसांनी केला त्याचं समर्थन करण्यापेक्षा त्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या (MVA) सर्व नेते मंडळींना मिरच्या झोंबल्या आहेत. त्यामुळे मविआकडून राज्यभरातील सर्व महिलामंडळांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल द्वेष निर्माण करण्यात येत आहेत. मात्र तरीही भाजपाचे देवाभाऊ सिंघम म्हणजेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे गृहमंत्री असल्यामुळे महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत. त्यांच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं तर देवाभाऊ त्यांना जागेवर ठेवणार नाही, अशा पद्धतीची भावना राज्यातल्या माताभगिनींच्या मनात तयार झालेली आहे. त्यामुळे महिलांना अश्लीय शिव्या आणि धमक्या देणा-या संजय राजाराम राऊत याने सकाळी उठून झाकणझुल्यासारखी बडबड करणे बंद करावे. तसेच महिला अत्याचार आणि बलात्काराबद्दल त्याने तोंडच उघडू नये, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. त्याचबरोबर संजय राऊतच्या मालकासह त्याच्या मुलावरही निशाणा साधला.


संजय राजाराम राऊतवर आजही डॉ. सपना पाटकरला छळण्याचा, धमकवण्याचा आरोप आहे. तिच्या घरावर दारुच्या बाटल्या मारल्या अशी व्यथा तिने व्यक्त केली. त्यामुळे संजय राऊतने सर्वात आधी त्या डॉक्टर महिलेला का आणि कशा प्रकारे छळतोस याबद्दल थोडी माहिती दे, तिची माफी माग आणि मग देवाभाऊ आणि आमच्या सरकारवर सिंगम आणि या सर्व गोष्टीची बडबड करण्याची हिंमत कर. नाहीतर कधीतरी त्या बहिणीला सुरक्षित ठेवण्यासाठी देवाभाऊचा वार तुझ्यावरही चालवावा लागेल, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकावले.


त्याचबरोबर पॉर्न फिल्म आणि संजय राजाराम राऊतच्या मालकाच्या मुलाचा काय संबंध हे कधीतरी आम्हाला बोलावं लागेल. मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर पॉर्नस्टार ठाकरे राहतो, त्याच्याही चित्रपटाची वेबसिरीज काढावी लागेल. मग तो किती विकृत आहे ते सर्व जगाला कळेल. लहान मुलांच्या चित्रपटामध्ये त्याचा काय रोल आहे, म्हणून उगाच संघ किंवा भाजपा पक्षाचे नेते मंडळींना बोलण्याआधी मातोश्रीमध्ये राहत असणारा पॉर्नस्टार ठाकरेला आधी आवर, अन्यथा आम्हाला गावागावांमध्ये मोठे स्क्रिन लावून या पॉर्नस्टार ठाकरेचे चित्रपट रिलीज करावे लागतील, असा निशाणाही नितेश राणे यांनी साधला.



महिला मातोश्रीमध्ये येण्यास घाबरतात


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना महिलांना मातोश्री सुरक्षित वाटायची. पण आज तिथे राहत असलेल्या एका विकृतामुळे मातोश्रीमध्ये महिला येण्यास घाबरतात. त्यामुळे मातोश्रीमध्ये राहत असलेल्या बलात्काऱ्याबद्दल शक्तीकपूर आणि रंजीतची भूमिका राबवणाऱ्याला तुम्ही आवर घाला, असेही नितेश राणे यांनी म्हटले.



संजय राऊत एक ठग्या आहे


आता उपमुख्यमंत्री पदालादेखील पुर्णविराम येईल, संजय राऊतने केलेल्या या वक्तव्यावर नितेश राणे यांनी धारदार टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, संजय राजाराम राऊत नावाचा जो पोपट आहे, तो नेहमी सरकार पडणार, पुर्णविराम मिळणार असं बोलत आहे. पण कधीही त्याची भविष्यवाणी खरी ठरली नाही. संजय राजाराम राऊत हा चौपाटीवर बसून झोली घेऊन भविष्यवाणी सांगणाऱ्यांसारखा एक ठग्या आहे, अशी खिल्ली नितेश राणे यांनी उडवली.

Comments
Add Comment

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता