पोलिसानेच पत्नीला पळवले! पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पती मुलांसह उपोषण करणार

अहमदनगर : एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीला पळवून नेल्याची तक्रार श्रीगोंदा येथील महिलेच्या पतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच सदर पोलीस हवालदाराला तात्काळ निलंबित करण्याची मागणी पिडीत पतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अन्यथा २७ सप्टेंबर पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुलांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात पिडीत पतीने म्हटले आहे की, या घटनेमुळे घरातील लहान मुले आईच्या प्रतिक्षेत असून, त्या पोलीस कर्मचाऱ्यास संपर्क साधला असता तो शिवीगाळ करुन धमकावत असल्याचा आरोप तक्रारदार आव्हान काळे यांनी केला आहे.


तक्रारदार काळे श्रीगोंदा तालुक्यात दोन मुले व एक मुलगीसह आपल्या पत्नीबरोबर राहत होते. मात्र कर्जत पोलीस स्टेशन येथील एका पोलीस कॉन्स्टेबल आपल्या पत्नीला घेऊन गेला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झाले असून, मायलेकरांची ताटातूट झाली आहे. तो पोलीस वर्दीचा गैरफायदा घेऊन धमकी देऊन शिव्या देत आहे.


सदर पोलिसाला पहिली पत्नी असून, मुले देखील आहेत. पहिली पत्नी असताना त्याने दुसरी पत्नी घेऊन जाऊन लग्न केले असे तो म्हणत आहे. खाकी वर्दीचा गैरफायदा घेऊन तो पोलीस अन्याय करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे