अहमदनगर : एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीला पळवून नेल्याची तक्रार श्रीगोंदा येथील महिलेच्या पतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच सदर पोलीस हवालदाराला तात्काळ निलंबित करण्याची मागणी पिडीत पतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अन्यथा २७ सप्टेंबर पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुलांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात पिडीत पतीने म्हटले आहे की, या घटनेमुळे घरातील लहान मुले आईच्या प्रतिक्षेत असून, त्या पोलीस कर्मचाऱ्यास संपर्क साधला असता तो शिवीगाळ करुन धमकावत असल्याचा आरोप तक्रारदार आव्हान काळे यांनी केला आहे.
तक्रारदार काळे श्रीगोंदा तालुक्यात दोन मुले व एक मुलगीसह आपल्या पत्नीबरोबर राहत होते. मात्र कर्जत पोलीस स्टेशन येथील एका पोलीस कॉन्स्टेबल आपल्या पत्नीला घेऊन गेला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झाले असून, मायलेकरांची ताटातूट झाली आहे. तो पोलीस वर्दीचा गैरफायदा घेऊन धमकी देऊन शिव्या देत आहे.
सदर पोलिसाला पहिली पत्नी असून, मुले देखील आहेत. पहिली पत्नी असताना त्याने दुसरी पत्नी घेऊन जाऊन लग्न केले असे तो म्हणत आहे. खाकी वर्दीचा गैरफायदा घेऊन तो पोलीस अन्याय करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…