'तो' अग्रलेख म्हणजे एकांगी कल्पनाविलास; माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई : विधानसभेत निवडून आलेल्या आमदाराचा अग्रलेखात उल्लेख "बाल, "कु. नितेश", "चिमखडे बोल" अशा शब्दात करणे म्हणजे एकांगी कल्पनाविलास आहे, असे स्पष्ट करत माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी लोकसत्ता दैनिकातील अग्रलेखावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


२३ सप्टेंबर २०२४ रोजीचा दैनिक लोकसत्ताच्या 'कर्मभूमीतील धर्मसंकट' या मथळ्याखालील अग्रलेखात माझा व माझ्या मुलाचा उल्लेख केला असल्याने आपण पत्र लिहित असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.


हा अग्रलेख म्हणजे सुरम्य कल्पनाविलासाचा नमुना असून यात उपहासाचाही उपयोग केला आहे. ४२ वर्षाच्या प्रगल्भ, विधानसभेवर निवडून आलेल्या आमदाराचा उल्लेख आपण "बाल, "कु. नितेश", "चिमखडे बोल" अशा शब्दात केला आहे. निवडणुक आयोगाच्या सौजन्याने पंतप्रधानांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अधिक वेळ मिळेल हा एक कल्पनाविलासाचा भाग आहे. अजितदादा यांच्याकडून कु. राणे याच्याविरोधात श्रेष्ठीकडे तक्रार केली असल्याची माहिती दिली जाते' हा सुध्दा कल्पनाविलासाचा नमुना आहे, असे पत्रात नमूद केले आहे.


या अग्रलेखामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाचाही उल्लेख केला आहे. लोकसभा निकालांमध्ये काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि (राष्ट्रवादी शरद पवार) यांच्या बाजूने मुस्लिम मतदारांनी एकगठ्ठा मतदान केले, याबद्दल मात्र आपण ब्र सुध्दा उच्चारलेला नाही. हिंदुत्व हा भारतीय जनता पक्षाचा आत्मा आहे. हिंदुत्वाचे रक्षण करणे व हिंदू विरोधी प्रवृत्तींना आळा घालणे हे आमचे कर्तव्यच आहे. तुम्ही मात्र एकांगी कल्पनाविलासातून हिंदू विरोधी भूमिका मांडत राहणार आहात. हा काही कल्पनाविलास नाही तर तुमचा इतिहास आहे, याकडे नारायण राणे यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे.


अग्रलेखात दिलेली माहिती कोणाकडून याचा काहीही उल्लेख नाही. 'ही सारी तयारी आहे अजितदादा यांनी महायुतीतून प्रस्थान ठेवावे याची' हा संपूर्ण परिच्छेद कल्पना विलासाचे इमल्यावर इमले चढवितो. वर्तमान पत्राच्या भाषेत याला टेबल न्युज म्हणतात.तुमच्या कडून तरी दुसरी कसली अपेक्षा ठेवावी? बाकी अग्रलेख व आपल्या स्तंभातून दारूचे गोडवे गाणा-याकडून कल्पनाविलासाचे इमलेच उभे राहणार आहेत, असेही नारायण राणे यांनी नमूद केले आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार