RTO Employees Strike : आरटीओ कर्मचारी आजपासून संपावर!

नेमके कारण काय?


अमरावती : आकृतीबंधाचा अंमलबजावणीसह महसुल स्तरावरील बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी (RTO Employees) संघटनेने आजपासून बेमुदत संपाची (Strike) हाक दिली आहे. या संपामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथील कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे.


मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर यांनी सांगीतले, मोटार वाहन विभागासाठी शासनाने सुधारीत आकृतीबंध २३ सप्टेंबर २०२२ पासून लागू केले. परंतू त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या. आकृतीबंधाची योग्य अंमलबजावणी न करता त्याचा आधार घेऊन महसूल विभागस्तरावर बदल्या करण्याची सुत्र शासनाने स्विकारली आहेत. त्यामुळे ३१ ऑगस्ट २०२४ रोजी महसूलस्तरावर बदल्या करण्यात आल्या. या बदल्या मान्य नसल्याने कर्मचाऱ्यांनी न्यायालयात (मॅट) दाद मागून त्यावर स्थगिती आदेश पारीत केला आहे.


आकृतीबंधाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ होत असल्यामुळे व महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी मोटार वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जात आहे. या संदर्भातील निवेदन वरिष्ठांना देण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयातील चतुर्थ व तृतीय श्रेणीतील शेकडो कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी होणार आहे. त्यामुळे वाहन नोंदणीपासून ते लायसन्सची सर्व कामे प्रभावित झाल्याचे दिसून येत होते.

Comments
Add Comment

लंडन ते हैद्राबाद विमानात तांत्रिक बिघाड; १६९ प्रवाशांचा जीव टांगणीला

नागपूर : ब्रिटिश एअरवेज बोईंग ७८७ हा विमान लंडनहुन हैद्राबादला येत होते. या विमानाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Beed: दहावीच्या मुलीचं अपहरण करत...; पीकअप चालकाच्या कृत्याने परिसरात तीव्र संताप

बीड: गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. आता केज तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली

महाराष्ट्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे.

संगमनेरमध्ये शिवजयंतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

एकाला अटक ; शहरात भीतीचे वातावरण संगमनेर : संगमनेर शहरात जुन्या वादातून एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने कोयता

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान; आंब्याच्या बागांनाही अवकाळीचा फटका

बीड : बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी,गारा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण

Nagpur News : बारावी पेपरफूटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील