Politics : राज्यात चौथ्या आघाडीची शक्यता!

अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी सोबतच तिसरी आघाडीनेही पुढचे पाऊल टाकले आहे. त्यात आता आणखी एक नवी आघाडी होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना सोबत घेण्याची चाचपणी केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा पर्याय असतानाच तिसऱ्या आघाडीचाही पर्याय पुढे आला आहे. राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडीने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यासाठी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर या नेत्यांनी ‘परिवर्तन महाशक्ती’ या आघाडीची घोषणा केली आहे.


दरम्यान, आता राज्यात आणखी एक पर्याय पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात ही आघाडी होण्याची शक्यता आहे. तशी चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. अपक्ष असूनही या निवडणुकीत मतदारांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता. तब्बल अडीच लाखांवर तुपकरांना मतदान झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, बुलढाणा, मेहकर आणि चिखली या मतदारसंघात तुपकर यांना चांगली मते मिळाली होती. तर तुपकरांशिवाय तिसरी आघाडी अपूर्ण असल्याचं मत आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. तर रविकांत तुपकर हे तिसऱ्या आघाडीत जाणार नसल्याचं त्यांनी अकोल्यात स्पष्ट केलं होतं.



पश्चिम विदर्भात तुपकर यांचा प्रभाव!


रविकांत तुपकर हे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन नेहमी रविकांत तुपकर हे आक्रमक पध्दतीने आंदोलन करतात. शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांची महत्वाची भूमीका राहिला आहे. लोकसभा निवडणुकीपासून राजू शेट्टी यांच्यापासून दूर गेलेले तुपकर यांनी स्वतःच्या बळावर बुलढाणा लोकसभा निवडणुक लढवली. त्यांना यश जरी आलं नसलं तरी चांगली मतं त्यांना मिळाली.


दरम्यान, शेतकऱ्यांचा लढवय्या चेहरा म्हणून बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ यासह पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांवर त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे याचा वंचितला मोठा फायदा होऊ शकतो. या जिल्ह्यात वंचितचा देखील मोठा प्रभाव आहे. अकोला जिल्हा हा वंचितचा गड मानला जातो. आगामी काळात काही मतदारसंघासाठी दोघेही एकत्र आल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर आणि तुपकर यांच्यातील संभाव्य राजकीय मैत्रीसंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही रविकांत तुपकर आणि प्रकाश आंबेडकरांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. परिणामी दोन्ही नेत्यांच्या प्रस्तावित युतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या