Price Hike : सणासुदीच्या काळात महागाईची झळ! भाज्या, खाद्यतेलासह सुका मेवाही कडाडला

मुंबई : सध्या सणासुदीचा काळ सुरु असून अशातच सर्वसामान्यांना महागाईची (Inflation) झळ सोसावी लागत आहे. भाज्यांचे दर कडाडले (Vegetables Price Hike) असताना मागील आठवड्यात खाद्यतेलांचा (Food Oil) भडका उडाला. अशातच नवरात्री, दिवाळी, दसरा या सारख्या सणांच्या कालावधीत प्रत्येक घरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. मात्र यासाठी लागणाऱ्या सुका मेवाचे (Dry Fruits) दरही वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणांच्या काळात गृहीणींचे बजेट कोलमडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी उत्सव जवळपास महिनाभरावर आली असताना दिवाळीत खाद्यतेलांसह सुका मेवा आणि इतर वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ होते. परंतु खाद्यतेलांवरील आयात शुल्कात २० टक्के वाढ केल्याने गेल्या आठवडाभरापासून खाद्यतेलांच्या दरांत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच खोबरे, जायफळ, शहाजिरे, मखाणा, काजू आदी वस्तूंच्याही दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत दरांत अधिक वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.



काय आहेत घाऊक बाजारातील दर?


खाद्यतेल (प्रति १५ किलो)

  • सूर्यफूल - २०२५

  • सोयाबीन - २०९०

  • शेंगदाणा - २७००


इतर पदार्थ

  • खोबरे २८० रुपये

  • मखाणा १६०० रुपये

  • काजू ९५० रुपये

  • शहाजिरे १००० रुपये

  • खोबरे किस ३०० रुपये

Comments
Add Comment

Navnath Ban : 'देवेंद्र फडणवीस लवकरच सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करतील'; भाजपचे नवनाथ बन यांचा दावा

मुंबई :  भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत,

Train Viral Video : चक्क चालत्या ट्रेनमध्ये पूजा अर्चा! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या भारतीय रेल्वेच्या (indian Railway) एका चालत्या डब्यात धार्मिक विधी आणि पूजा केली जात

Jejuri Palkhi Accident : जेजुरी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन

Sunetra Pawar : सासवड-जेजुरी मार्गावरील अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रुग्णालयात; जखमी वारकऱ्यांना दिला धीर, तातडीच्या उपचाराचे आदेश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने वारकरी

Asmita Katkar death case : मुलगा होईल म्हणून कपडे घेतले आणि...; अस्मिता काटकर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण! आई-वडिलांचे सासरच्यांवर गंभीर आरोप

कोल्हापूर : कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात एका महिन्याच्या चिमुकलीच्या आईने आत्महत्या केल्याच्या घटनेने

Ashadhi Wari Accident : जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात अपघात; टेम्पोच्या धडकेत ३ वारकरी महिलांचा मृत्यू, ४ वारकरी जखमी

जेजुरी : आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळा सुरू असतानाच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Palkhi) मार्गावर मोठी दुर्घटना (Accident)