Nitesh Rane : काहीही घोषणा देण्यासाठी मुंबई म्हणजे तुमच्या आप्पाचा पाकिस्तान नाही!

रॅली काढून नौटंकी करणाऱ्यांच्या हातात तिरंगा शोभत नाही!


आमदार नितेश राणे यांनी जिहादी लोकांना फटकारले


मुंबई : मुंबईत गणेश चतुर्थीनंतर मोहम्मद पैगंबराच्या वाढदिवसानिमित्त जिहादीचे लोकांनी जमून मुंबईत रॅली काढली होती. मात्र त्या रॅलीत जिहादी लोकांनी पॅलिस्टाईनचे झेंडे फडकवले, 'सर तनसे जुदा' हे नारे दिले तसेच हिंदुंच्या विरोधात आई-बहिणींवर घाणेरड्या घोषणा दिल्या. त्यावर भाजपा पक्षाचे आमदार आणि हिंदु धर्म रक्षक नितेश राणे (Nitesh Rane) यांनी घणाघात केला आहे.


मुंबईत जिहादीच्या निघालेल्या रॅलीने ज्या ठिकाणी ९० टक्के हिंदू लोक राहतात त्याठिकाणी पॅलिस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले? 'सर तनसे जुदा' हे नारे कसे दिले? हिंदुंच्या विरोधात आई-बहिणीवर घाणेरड्या घोषणा कशा दिल्या? मंदिरांच्या बाहेर जोर-जोरात डीजे कसे लावले? जिहादी जर संविधानाला मानत असतील तर या भारत देशामध्ये 'सर तनसे जुदा' या घोषणा कशा लागतात. म्हणून आज मुंबईत जे जिहादी जमलेले आहेत त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे म्हणत नितेश राणे यांनी जिहादींवर टिकास्त्र सोडले.



जिहादी लोकांनी आधी भगवद् गीता वाचावी


जिहादी लोकांच्या हातात संविधान चांगलं दिसत नाही. जिहादींनी मुंबईत काढलेल्या रॅलीत हातात तिरंगा घेऊन केवळ नाटक आणि नौटंकी केली. या लोकांनी वेळेत भगवद् गीताचे चार-दहा पानं वाचली असती तर त्यांच्यावर आज ही रॅली काढण्याची परिस्थिती आली नसती. परमपुज्य रामगिरे महाराज आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते हिंदुंची बाजू लावून धरत आहेत. ते इतर कोणत्याही अन्य धर्माला बोलत नाही. पण अशावेळी तुम्ही हिंदुंना अंगावर घेत असाल तर ते देखील तुम्हाला शिंगांवर घेतील, असे म्हणत नितेश राणे यांनी जिहादी लोकांना फटकावले.



जिहादींनी संविधानाच्या विषयावर काहीच बोलू नये


संविधानामध्ये सर्व धर्मांना योग्य सन्मान देणं हेच लिहिले आहे. तरीही जिहादी लोकांनी गणेशचतुर्थीच्या मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक झाली त्याप्रकरणावर निषेध केला नाही, त्यामुळे जिहादींनी संविधानाच्या विषयावर काहीच बोलू नये. मुंबईत रॅली काढून हिंदूना डिवचणं आणि त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न होत असेल, तर हिंदूही एकत्र येऊन आपली ताकद दाखवू शकतात. असे झाल्यास मुंबई देखील कमी पडेल. म्हणून राज्यात जिहादी वाल्यांचे लाड कोणीही करणार नाही. रामगिरी महाराज यांनी बोलल्याप्रमाणे झाकीर नाईकसह इतर मुस्लिम धर्मातील अनेक लोकही बोलले होते. त्यामुळे सर्वात आधी त्या झाकीर नाईकचा सर तनसे जुदा करा त्यानंतर रामगिरी महाराजांकडे वाकड्या नजरेने बोट दाखवा, असे बोलत नितेश राणे यांनी जिहादी लोकांना चांगलाच चाप दिला.

Comments
Add Comment

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

शिक्षकांकडून अमानुष वागणूक; लहानग्याच्या छळाप्रकरणी पोलिसांची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षकांकडून अमानुष वागणूक

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

खोटा बनाव रचत, मुलीच्या आजाराला कंटाळून जन्मदात्या आईनेच घेतला ६ वर्षांच्या मुलीचा जीव

पनवेल : आई आणि तीच मूल मग मुलगा असो वा मुलगी यांच्या नात्याची दुसऱ्या कोणत्याही नात्याशी तुलना करता येत नाही. आपलं

धुरंधरलाही या चित्रपटाने टाकलं मागे, पहिल्याच आठवड्यात कमवले १०० कोटी

भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात रचला इतिहास सध्या सगळीकडेच धुरंधर हा चित्रपट फेमस झाला

Shilpa Shetty...शिल्पा शेट्टी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय, AI मॉर्फ कंटेंटवर बंदी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा गैरवापर सर्रासपणे केला जातो. मागील काही दिवसात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे देखील