PM Narendra Modi : पुण्यात 'या' तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते होणार अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन!

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २६ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्याच्या (Pune News) नवीन भूमिगत मेट्रो (Metro) मार्गाचे उद्घाटन करतील. दिवाणी न्यायालय ते स्वारगेटपर्यंत धावणाऱ्या या मेट्रो मार्गामुळे शहराच्या कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. याबरोबर या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.


या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी दोन मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. यामध्ये स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा विस्तार आणि पिंपरी चिंचवड ते निगडी असा कॉरिडॉर यांचा समावेश आहे.


या दोन्ही नव्या प्रकल्पांमुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणखी सुधारणा होणार आहे. यासह पुणेकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे.


नवीन भूमिगत मेट्रो मार्गामध्ये आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाठी अनेक आधुनिक सुविधांचा समावेश आहे. यात आधुनिक स्थानके, सुरक्षा आणि आरामदायी प्रवास यांचा समावेश आहे.


दिवाणी न्यायालय ते स्वारगेट मार्गावरील भूमिगत मेट्रो ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित आहेत. तसेच मेट्रोची रचना प्रत्येक प्रवाशाला लक्षात घेऊन केली गेली आहे, ज्यामध्ये रॅम्प आणि दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळ्या जागेची व्यवस्था केली आहे. याचबरोबर पुण्यातील हा नवा मेट्रो मार्ग पूर्णपणे इको-फ्रेंडली आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,