Solapur Airport : सोलापूर विमानतळाचे २६ सप्टेंबरला उद्घाटन; 'अशी' असणार विमानसेवा!

सोलापूर : सोलापुरात अखेर तो दिवस उजाडला असून अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. सोलापूरच्या विमानतळावरून विमान उडण्यास परवानगी देण्यात आली असून या नूतनीकरण झालेल्या विमानतळाचे उद्घाटन येत्या २६ सप्टेंबर रोजी पुणे येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.सुरुवातीला सोलापूर पुणे अशी विमानसेवा सुरू होणार असल्याचे समजते. केवळ ४० मिनिटात सोलापूर मधून पुण्याला जाता येणार आहे. यानंतर सोलापूर मुंबई विमानसेवा नोव्हेंबर अखेर सुरू करण्याचा प्रयत्न राहील असे सांगण्यात येते.


जून २०२३ मध्ये विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली. त्यानंतर विमान सेवा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता लागली होती. अनेक महिन्यांपासून विमानतळाच्या नूतनीकरणाचे करण्याचे काम सुरू होते.


जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः लक्ष घालून विमानतळातील कामे करून घेतली. भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नानंतर आता विमान सेवा सुरू होत आहे. सोलापूर विकास मंचने सुद्धा विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांचाही यामध्ये वाटा असल्याचे म्हणावे लागेल.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी