Solapur Airport : सोलापूर विमानतळाचे २६ सप्टेंबरला उद्घाटन; 'अशी' असणार विमानसेवा!

  271

सोलापूर : सोलापुरात अखेर तो दिवस उजाडला असून अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. सोलापूरच्या विमानतळावरून विमान उडण्यास परवानगी देण्यात आली असून या नूतनीकरण झालेल्या विमानतळाचे उद्घाटन येत्या २६ सप्टेंबर रोजी पुणे येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.सुरुवातीला सोलापूर पुणे अशी विमानसेवा सुरू होणार असल्याचे समजते. केवळ ४० मिनिटात सोलापूर मधून पुण्याला जाता येणार आहे. यानंतर सोलापूर मुंबई विमानसेवा नोव्हेंबर अखेर सुरू करण्याचा प्रयत्न राहील असे सांगण्यात येते.


जून २०२३ मध्ये विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली. त्यानंतर विमान सेवा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता लागली होती. अनेक महिन्यांपासून विमानतळाच्या नूतनीकरणाचे करण्याचे काम सुरू होते.


जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः लक्ष घालून विमानतळातील कामे करून घेतली. भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नानंतर आता विमान सेवा सुरू होत आहे. सोलापूर विकास मंचने सुद्धा विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांचाही यामध्ये वाटा असल्याचे म्हणावे लागेल.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या