BSNL ने Jio, Airtel आणि Vi सगळ्यांना टाकले मागे, याबाबतीत बनली नंबर १

मुंबई: बीएसएनएलच्या सध्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत आहे. खरंतर, जुलै २०२४मध्ये जेव्हापासून रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाने आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. तेव्हापासून बीएसएनएलबद्दल खूप चर्चा केली जात आहे. आता बीएसएनएलने आणखी एका बाबतीत सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांना मागे सोडले आहे.



BSNL चा जलवा


खाजगी कंपन्यांकडून रिचार्ज प्लान्सचे दर ३० टक्क्यांनी वाढवल्यानंतर आता लोकांनी सोशल मीडियावर असे म्हणणे सुरू केले आहे की आता त्यांच्याकडे बीसएसएनएल हा एकमेव पर्याय राहिला आहे. लोक तर बीएसएनएलमध्ये आपला नंबर पोर्ट करण्याबाबतही बोलत आहेत. आंध्र प्रदेशातील राज्यांमधील अनेक जणांनी आपापले नंबर्स बीएसएनएलमध्ये पोर्टही केले होते. तसेच अनेक युजर्स बीएसएनएलमध्ये सामील झाले आहेत.


याबाबतीत टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIने जुलै महिन्यात एक डेटा जारी केला आहे. यात तुम्हाला सर्व काही समजेल. या डेटानुसार जुलैच्या महिन्यात वायरलेस सबस्क्रायबर्सची संख्या कमी होऊन १२०.५१७ कोटी झाली होती. तर जून महिन्यात ही संख्या १२०.५६४ कोटी झाली होती.


ट्रायच्या डेटानुसार खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सचे दर वाढवल्यानंतर जुलैमध्ये सर्वाधिक नुकसान एअरटेलला झाले होते. भारती एअरटेलने १६.९ लाख युजर्स गमावले होते. तर वोडाफोन आयडियाने १४.१ लाख युजर्स गमावले होते. तर तिसऱ्या स्थानावर रिलायन्स जिओ होते. त्यांनी ७.५८ लाख युजर्स गमावले होते.


दुसरीकडे जुलै महिन्यात भारतातील एकमेव टेलिकॉम कंपनी अशी होती की ज्यांना ग्राहकांच्या बाबतीत नुकसान नव्हे तर फायदा झाला होता. जुलैमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या वाढली होती. खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सचे दर वाढवल्यानंतर देशभरात २९.४ लाख ग्राहक जोडले गेले होते.

Comments
Add Comment

BMC News : सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागातील स्वच्छतेवर भर द्या, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील

BMC : महापालिका आयुक्तांच्या भेटीनंतर अतिरिक्त आयुक्तांची रुग्णालयात धाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर आश्विनी भिडे यांनी महापालिका

Water Cut : दक्षिण मुंबईत बुधवारी पाणीकपात होणार, नागरिकांचे हाल होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग

Railway News : कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या आणि सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड 'वंदे भारत'च्या वेळेत बदल

मुंबई : कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या आणि सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड 'वंदे भारत'च्या वेळेत बदल करण्यात आला

Mumbai Crime : मुंबईत भोंदू फकीर अटकेत; उपचाराच्या नावाखाली महिलांवर अत्याचाराचा आरोप

मुंबई : नाशिक आणि संगमनेरमधील भोंदूबाबांच्या प्रकरणांची चर्चा अजून थंड झालेली नसतानाच मुंबईतही अशाच प्रकारचे

Vasai : वसईत मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी