BSNL ने Jio, Airtel आणि Vi सगळ्यांना टाकले मागे, याबाबतीत बनली नंबर १

मुंबई: बीएसएनएलच्या सध्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत आहे. खरंतर, जुलै २०२४मध्ये जेव्हापासून रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाने आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. तेव्हापासून बीएसएनएलबद्दल खूप चर्चा केली जात आहे. आता बीएसएनएलने आणखी एका बाबतीत सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांना मागे सोडले आहे.



BSNL चा जलवा


खाजगी कंपन्यांकडून रिचार्ज प्लान्सचे दर ३० टक्क्यांनी वाढवल्यानंतर आता लोकांनी सोशल मीडियावर असे म्हणणे सुरू केले आहे की आता त्यांच्याकडे बीसएसएनएल हा एकमेव पर्याय राहिला आहे. लोक तर बीएसएनएलमध्ये आपला नंबर पोर्ट करण्याबाबतही बोलत आहेत. आंध्र प्रदेशातील राज्यांमधील अनेक जणांनी आपापले नंबर्स बीएसएनएलमध्ये पोर्टही केले होते. तसेच अनेक युजर्स बीएसएनएलमध्ये सामील झाले आहेत.


याबाबतीत टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIने जुलै महिन्यात एक डेटा जारी केला आहे. यात तुम्हाला सर्व काही समजेल. या डेटानुसार जुलैच्या महिन्यात वायरलेस सबस्क्रायबर्सची संख्या कमी होऊन १२०.५१७ कोटी झाली होती. तर जून महिन्यात ही संख्या १२०.५६४ कोटी झाली होती.


ट्रायच्या डेटानुसार खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सचे दर वाढवल्यानंतर जुलैमध्ये सर्वाधिक नुकसान एअरटेलला झाले होते. भारती एअरटेलने १६.९ लाख युजर्स गमावले होते. तर वोडाफोन आयडियाने १४.१ लाख युजर्स गमावले होते. तर तिसऱ्या स्थानावर रिलायन्स जिओ होते. त्यांनी ७.५८ लाख युजर्स गमावले होते.


दुसरीकडे जुलै महिन्यात भारतातील एकमेव टेलिकॉम कंपनी अशी होती की ज्यांना ग्राहकांच्या बाबतीत नुकसान नव्हे तर फायदा झाला होता. जुलैमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या वाढली होती. खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सचे दर वाढवल्यानंतर देशभरात २९.४ लाख ग्राहक जोडले गेले होते.

Comments
Add Comment

Tree Protection Rules : यापुढे रस्ते कामांसह इतर प्रकल्पांच्या खोदकाता झाडांभोवती जेसीबी,पोकलेन वापरण्यास बंदी

 Mumbai: मुंबईतील कुठल्याही उपयुक्तता संस्थासाठी मग रस्ते असेल वा पर्जन्य जलवाहिनी, मलवाहिनींसह इतर कामांसाठी

BMC News : प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने स्वतंत्र एसओपी

मोर्शी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डम्पिंग ग्राऊंडवरील

Organ Donation Awareness : अवयवदानाचा संकल्प करत आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी साजरा केला वाढदिवस

अवयव दान चळवळीचे नेतृत्व करणार भांदिर्गे मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई: वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, केक आणि

Kolhapur Vaibhavwadi Railway Line :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन

मंत्री नितेश राणे; ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनासाठी प्रयत्न मुंबई (सुहास शेलार)

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण