BSNL ने Jio, Airtel आणि Vi सगळ्यांना टाकले मागे, याबाबतीत बनली नंबर १

मुंबई: बीएसएनएलच्या सध्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत आहे. खरंतर, जुलै २०२४मध्ये जेव्हापासून रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाने आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. तेव्हापासून बीएसएनएलबद्दल खूप चर्चा केली जात आहे. आता बीएसएनएलने आणखी एका बाबतीत सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांना मागे सोडले आहे.



BSNL चा जलवा


खाजगी कंपन्यांकडून रिचार्ज प्लान्सचे दर ३० टक्क्यांनी वाढवल्यानंतर आता लोकांनी सोशल मीडियावर असे म्हणणे सुरू केले आहे की आता त्यांच्याकडे बीसएसएनएल हा एकमेव पर्याय राहिला आहे. लोक तर बीएसएनएलमध्ये आपला नंबर पोर्ट करण्याबाबतही बोलत आहेत. आंध्र प्रदेशातील राज्यांमधील अनेक जणांनी आपापले नंबर्स बीएसएनएलमध्ये पोर्टही केले होते. तसेच अनेक युजर्स बीएसएनएलमध्ये सामील झाले आहेत.


याबाबतीत टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIने जुलै महिन्यात एक डेटा जारी केला आहे. यात तुम्हाला सर्व काही समजेल. या डेटानुसार जुलैच्या महिन्यात वायरलेस सबस्क्रायबर्सची संख्या कमी होऊन १२०.५१७ कोटी झाली होती. तर जून महिन्यात ही संख्या १२०.५६४ कोटी झाली होती.


ट्रायच्या डेटानुसार खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सचे दर वाढवल्यानंतर जुलैमध्ये सर्वाधिक नुकसान एअरटेलला झाले होते. भारती एअरटेलने १६.९ लाख युजर्स गमावले होते. तर वोडाफोन आयडियाने १४.१ लाख युजर्स गमावले होते. तर तिसऱ्या स्थानावर रिलायन्स जिओ होते. त्यांनी ७.५८ लाख युजर्स गमावले होते.


दुसरीकडे जुलै महिन्यात भारतातील एकमेव टेलिकॉम कंपनी अशी होती की ज्यांना ग्राहकांच्या बाबतीत नुकसान नव्हे तर फायदा झाला होता. जुलैमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या वाढली होती. खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सचे दर वाढवल्यानंतर देशभरात २९.४ लाख ग्राहक जोडले गेले होते.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या