Dharavi News : धारावीत तणावपूर्ण वातावरण! शेकडो नागरिक उतरले रस्त्यावर

जाणून घ्या नेमके प्रकरण काय?


मुंबई : मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी धारावीमधील एका मशिदीचा (Dharavi Mosque) अवैध भाग पाडल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या गोष्टीला विरोध करण्यासाठी मुस्लिम समूदाय रस्त्यावर उतरले असून आंदोलनाला सुरुवात केली आहे. तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली असल्यामुळे सध्या धारावीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.


आज सकाळी मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी धारावी येथील ९० फूट रोडवरील २५ वर्ष जुनी सुभानिया मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी दाखल झाले. मात्र ही मशीद खूप जुनी आहे, त्यामुळे ती पाडू नये असे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र तरीही बीएकसी कर्मचाऱ्यांनी त्या मशिदीचा अवैध भाग पाडल्यामुळे संतप्त जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.


मशिदीचा अवैध भाग पाडल्यामुळे वाद पेटला असून घटनास्थळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Comments
Add Comment

सात जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल

Mumbai : आनंदाची बातमी, पावसाळ्याआधी हे उड्डाणपूल सुरू होणार, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबई : राज्याच्या राजधानीतील वाहतूक कोंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईतील सात उड्डाणपुलांचे काम

EV : महाराष्ट्रात ई वाहनांना चालना देण्यासाठी कोट्यवधींच्या निधीचे वितरण

मुंबई : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र