Dharavi News : धारावीत तणावपूर्ण वातावरण! शेकडो नागरिक उतरले रस्त्यावर

  182

जाणून घ्या नेमके प्रकरण काय?


मुंबई : मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी धारावीमधील एका मशिदीचा (Dharavi Mosque) अवैध भाग पाडल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या गोष्टीला विरोध करण्यासाठी मुस्लिम समूदाय रस्त्यावर उतरले असून आंदोलनाला सुरुवात केली आहे. तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली असल्यामुळे सध्या धारावीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.


आज सकाळी मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी धारावी येथील ९० फूट रोडवरील २५ वर्ष जुनी सुभानिया मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी दाखल झाले. मात्र ही मशीद खूप जुनी आहे, त्यामुळे ती पाडू नये असे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र तरीही बीएकसी कर्मचाऱ्यांनी त्या मशिदीचा अवैध भाग पाडल्यामुळे संतप्त जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.


मशिदीचा अवैध भाग पाडल्यामुळे वाद पेटला असून घटनास्थळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Comments
Add Comment

झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…

राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर मुंबई : ‘झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…,’

मुंबईतील उद्योजकाने राम मंदिरासाठी केले १७५ किलो सोने अर्पण

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी आजही अयोध्येत लाखो भाविक राम मंदिराच्या

धक्कादायक ! रेल्वे अपघातात ७२००० जणांचा गेला जीव, माहिती अधिकारातून आकडेवारी स्पष्ट...

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या रेल्वेची धक्कादायक माहिती समोर आली. आतापर्यंत रेल्वे अपघातात ७२०००

Railway ticket price : रेल्वेच्या तिकिट दरात वाढ, तत्काळ बुकिंगसाठी नवीन नियम जारी...

मुंबई : देशभरातील कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने अनेक कालावधीनंतर भाडेवाढ करण्याचा निर्णय

भाईजानच्या आरोग्याचा खुलासा : मेंदूचे गंभीर आजार आणि लढण्याची जिद्द

मुंबई : बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान. त्याच्या फिटनेस आणि अ‍ॅक्शन सीनमुळे तो लाखो तरुणांचा आदर्श आहे. मात्र

मुंबईत मोठ्या भरतीचा इशारा, मुंबईकरांनो जीव सांभाळा

मुंबईचा समुद्र खवळला: ५  दिवस मोठी भरती , १९ वेळा उंच लाटांचा इशारा मुंबई : यंदा मुंबईचा समुद्र जरा जास्तच खवळणार