Saptashrungi Devi : भाविकांना मिळणार सप्तश्रृंगी देवीचं सुलभ दर्शन! नवरात्रोत्सवात मंदिर राहणार २४ तास खुलं

  212

नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या (Saptashrungi Devi) दर्शनासाठी (Darshan) नेहमीच भाविकांची मोठी रांग लागल्याचे पाहायला मिळते. अशातच येत्या नवरात्रोत्सवात (Navratri) देशभरातून लाखो भाविकं वणी येथे येतात. या काळात भाविकांची मोठी संख्या पाहता त्या पार्श्वभूमीवर सप्तशृंग निवासिनी ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या आधारे नवरात्रोत्सव काळामध्ये भाविकांना सप्तश्रृंगी देवीचे दर्शन सुलभरित्या मिळू शकणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गत वर्षी प्रमाणे यंदाही शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत यांच्या बैठकीमध्ये गर्दीचं नियोजन आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. याबाबत उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आली असून यंदाही ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान नऊ दिवसांसाठी मंदिर २४ तास खुले राहणार आहे. नवरात्रौत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.



खासगी वाहतूक बंद


नवरात्रौत्सवात मंदिरासह गडावर देवीच्या मंदिरात जाणारी फनिक्युलर ट्रॉली देखील २४ तास कार्यान्वित असणार आहे. मंदिर गाभाऱ्यात फनिक्युलर ट्रॉलीने येणाऱ्या भाविकांना ३० टक्के तर पायरीने येणाऱ्या भाविकांना ७० टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु नवरात्रौत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडादरम्यान खासगी वाहतूक देखील बंद राहणार आहे. १०० एसटी बसेसच्या माध्यमातून नांदुरी ते सप्तशृंगी गड भाविकांची वाहतूक करण्याचं नियोजन आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या