Saptashrungi Devi : भाविकांना मिळणार सप्तश्रृंगी देवीचं सुलभ दर्शन! नवरात्रोत्सवात मंदिर राहणार २४ तास खुलं

नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या (Saptashrungi Devi) दर्शनासाठी (Darshan) नेहमीच भाविकांची मोठी रांग लागल्याचे पाहायला मिळते. अशातच येत्या नवरात्रोत्सवात (Navratri) देशभरातून लाखो भाविकं वणी येथे येतात. या काळात भाविकांची मोठी संख्या पाहता त्या पार्श्वभूमीवर सप्तशृंग निवासिनी ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या आधारे नवरात्रोत्सव काळामध्ये भाविकांना सप्तश्रृंगी देवीचे दर्शन सुलभरित्या मिळू शकणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गत वर्षी प्रमाणे यंदाही शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत यांच्या बैठकीमध्ये गर्दीचं नियोजन आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. याबाबत उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आली असून यंदाही ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान नऊ दिवसांसाठी मंदिर २४ तास खुले राहणार आहे. नवरात्रौत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.



खासगी वाहतूक बंद


नवरात्रौत्सवात मंदिरासह गडावर देवीच्या मंदिरात जाणारी फनिक्युलर ट्रॉली देखील २४ तास कार्यान्वित असणार आहे. मंदिर गाभाऱ्यात फनिक्युलर ट्रॉलीने येणाऱ्या भाविकांना ३० टक्के तर पायरीने येणाऱ्या भाविकांना ७० टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु नवरात्रौत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडादरम्यान खासगी वाहतूक देखील बंद राहणार आहे. १०० एसटी बसेसच्या माध्यमातून नांदुरी ते सप्तशृंगी गड भाविकांची वाहतूक करण्याचं नियोजन आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये