Tirupati Prasad : तिरुपतीच्या लाडू प्रसादात मांसाहाराचा समावेश; होणार कडक चौकशी!

चंद्राबाबूंच्या आरोपांची केंद्राकडून गंभीर दखल


नवी दिल्ली : तिरुपती (Tirupati Balaji) देवस्थानातील प्रसादाच्या लाडूंमध्ये (Laddu Prasad) जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याच्या गंभीर आरोप करण्यात आला आहे. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी आणि इतर कमी दर्जाच्या घटकांच्या कथित वापरासंदर्भात अहवाल मागवला आहे.


तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता, असा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावर केला आहे. दरम्यान, जगनमोहन रेड्डी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पण यावरुन आंध्र प्रदेशात वाद पेटला आहे.



जेपी नड्डा यांच्याकडून कारवाईचा इशारा


या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी याबाबत माहिती मिळाल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. नेमके काय झाले आहे? याबाबत त्यांच्याकडून तपशील जाणून घेतला. मी त्यांना उपलब्ध असलेला अहवाल देण्यास सांगितले आहे; जेणेकरून आम्ही त्याचे परीक्षण करू. मी राज्यातील नियामकांशीही बोलू. नियामक आणि अन्न सुरक्षा मानकांनुसार योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अहवालाची सखोल परीक्षण करेल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल, असेही जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.



‘अन्नदानम’चा दर्जा खालावल्याचा आरोप


मागील ५ वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत होता तेव्हा त्यांनी देवस्थानचे पावित्र्य घालवले. ‘अन्नदानम’ अर्थात अन्नदानाच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला, असा आरोप नायडू यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Leopard Conflict : 'गोळी' की 'नसबंदी'? बिबट्याला पकडण्यासाठी सरकारचा मास्टरस्ट्रोक! तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च करणार अन्...

जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junner) आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या (Leopard) संख्येत सातत्याने वाढ होत आहे,

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक

कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय

पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद