Tirupati Prasad : तिरुपतीच्या लाडू प्रसादात मांसाहाराचा समावेश; होणार कडक चौकशी!

चंद्राबाबूंच्या आरोपांची केंद्राकडून गंभीर दखल


नवी दिल्ली : तिरुपती (Tirupati Balaji) देवस्थानातील प्रसादाच्या लाडूंमध्ये (Laddu Prasad) जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याच्या गंभीर आरोप करण्यात आला आहे. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी आणि इतर कमी दर्जाच्या घटकांच्या कथित वापरासंदर्भात अहवाल मागवला आहे.


तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता, असा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावर केला आहे. दरम्यान, जगनमोहन रेड्डी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पण यावरुन आंध्र प्रदेशात वाद पेटला आहे.



जेपी नड्डा यांच्याकडून कारवाईचा इशारा


या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी याबाबत माहिती मिळाल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. नेमके काय झाले आहे? याबाबत त्यांच्याकडून तपशील जाणून घेतला. मी त्यांना उपलब्ध असलेला अहवाल देण्यास सांगितले आहे; जेणेकरून आम्ही त्याचे परीक्षण करू. मी राज्यातील नियामकांशीही बोलू. नियामक आणि अन्न सुरक्षा मानकांनुसार योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अहवालाची सखोल परीक्षण करेल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल, असेही जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.



‘अन्नदानम’चा दर्जा खालावल्याचा आरोप


मागील ५ वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत होता तेव्हा त्यांनी देवस्थानचे पावित्र्य घालवले. ‘अन्नदानम’ अर्थात अन्नदानाच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला, असा आरोप नायडू यांनी केला आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास