स्थानिक भूमिपुत्रांचा मीठ व्यवसाय दिशाहीन धोरणामुळे झाला उध्वस्त

मुंबई(दीपक मोहिते) - एकेकाळी जगभरातील २० देशांना वार्षिक ७ मिलियन टन मीठ निर्यात करणारे आपल्या देशातील मीठ उत्पादक व्यवसायिक व कामगार सध्या उपेक्षित जीवन जगत आहेत.गेल्या २० वर्षात या व्यवसायावर अनेक संकटे कोसळली व हा व्यवसाय उतरणीला लागला.त्यामागे निसर्ग व मानवनिर्मित कारणे आहेत.या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात स्थानिक भूमिपुत्र रोजगार मिळवत होते.अनेक कुटुंबाचा चरितार्थ चालत होता.पण कालांतराने सरकारने बहूराष्ट्रीय कंपन्यांना परवानग्या देण्याचा सपाटा सुरू केला व भूमिपुत्र या व्यवसायातून बाहेर फेकला गेला.तर या व्यवसायात रोजगार मिळवणारे मजूर पार देशोधडीला लागले.


मीठ व्यवसाय हा प्रामुख्याने समुद्रकिनारी असलेल्या गावातील खारटन जमिनीवर केला जातो.भरतीच्या वेळी नजीकच्या खाडीत असलेले खारट पाणी शिवारात घ्यायचे व त्यावर प्रक्रिया करून मीठ उत्पादन घ्यायचे,अशा पद्धतीने पूर्वी हा व्यवसाय करण्यात येत असे.त्यानंतर सन २००० मध्ये केंद्रसरकारने मीठ धोरणात बदल केला व तो बदल भूमीपुत्राच्या व्यवसायाच्या मुळावर आला.या व्यवसायात बहुराष्ट्रीय कंपन्या उतरल्या व व्यवसाय उतरणीला लागला.


केंद्रसरकारच्या या धोरणामुळे महाराष्ट्रातील नावाजलेली गोगटे सॉल्ट कंपनी इतिहास जमा झाली.अशावेळी तामिळनाडू व गुजरात राज्यातून मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रात मीठ येऊ लागल्यामुळे छोट्या व्यवसायिकांचे कंबरडे पार मोडून पडले.तसेच याच काळात सरकारने आयोडीनयुक्त मिठाची सक्ती केल्यामुळे अनेक भूमीपुत्रांनी आपले व्यवसाय गुंडाळले.एकेकाळी मोठ्याप्रमाणावर मिठाची निर्यात करणाऱ्या या आपल्या देशातील लहान मीठ व्यवसायिक आता इतिहासजमा झाले आहेत.


काबाडकष्ट करून ज्यांनी हे व्यवसाय उभे केले,त्यांनी केंद्रसरकारकडून ९९ वर्षाच्या लीजवर मिळालेल्या जमिनी परत केल्या आहेत.पण आता या जमिनी धनदांडग्या बिल्डरांच्या घश्यात घालण्याचे काम सुरू झाले आहे.आज मासेमारी, वीटभट्टी व रेती या तीन व्यवसायावर सरकारची वक्र नजर पडू लागली आहे,भविष्यात या तीनही व्यवसायाला घरघर लागण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून