ST Bus : महाड आगाराला गणपती बाप्पा पावले!

गणेशोत्सव काळात २१ लाख ३३ हजाराचे जादा उत्पन्न


महाड : कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी महाड पोलादपूर तालुक्यात येणाऱ्या आणि त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी महाड एस.टी.आगारातून मुंबई,मुंबई उपनगर,पुणे या मार्गावर जादा बसेस व जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव काळात महाड एस.टी.आगाराने ५७५३५ किमी जादा वाहतुक केली असून आगाराला या काळात तब्बल २१ लाख ३३ हजाराचे जादा उत्पन्न मिळाले.


गणेशोत्सवासाठी महाड पोलादपूर तालुक्यातील गणेश भक्तांना येण्यासाठी महाड एस टी आगारातून दि. ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान मुंबई पुणे व मुंबई उपनगरातून नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. या कालावधीत महाड आगारातून नियमित भारमाना व्यतिरिक्त १५ ७८१ किमी जादा वाहतुक केली गेली यातून आगाराला ५ लाख ८३ हजार ५०६ रुपयाचे जादा उत्पन्न मिळाले. तर गणेशोत्सवा करीता आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी महाड आगारातून दि. १२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यत ४१७५४ किमीची जादा वाहतुक करण्यात आली यातून महाड आगाराला १५ लाख ५० हजार २८६ रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले. या काळात महाड आगारातून नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा फेऱ्या, ग्रुप बुकिंग अशा बसेस सोडण्यात आल्या.यामुळे गणेशोत्सवात महाड आगाराने तब्बल २१ लाख ३३ हजाराचे जादा उत्पन्न कमावले.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये