ST Bus : महाड आगाराला गणपती बाप्पा पावले!

गणेशोत्सव काळात २१ लाख ३३ हजाराचे जादा उत्पन्न


महाड : कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी महाड पोलादपूर तालुक्यात येणाऱ्या आणि त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी महाड एस.टी.आगारातून मुंबई,मुंबई उपनगर,पुणे या मार्गावर जादा बसेस व जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव काळात महाड एस.टी.आगाराने ५७५३५ किमी जादा वाहतुक केली असून आगाराला या काळात तब्बल २१ लाख ३३ हजाराचे जादा उत्पन्न मिळाले.


गणेशोत्सवासाठी महाड पोलादपूर तालुक्यातील गणेश भक्तांना येण्यासाठी महाड एस टी आगारातून दि. ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान मुंबई पुणे व मुंबई उपनगरातून नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. या कालावधीत महाड आगारातून नियमित भारमाना व्यतिरिक्त १५ ७८१ किमी जादा वाहतुक केली गेली यातून आगाराला ५ लाख ८३ हजार ५०६ रुपयाचे जादा उत्पन्न मिळाले. तर गणेशोत्सवा करीता आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी महाड आगारातून दि. १२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यत ४१७५४ किमीची जादा वाहतुक करण्यात आली यातून महाड आगाराला १५ लाख ५० हजार २८६ रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले. या काळात महाड आगारातून नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा फेऱ्या, ग्रुप बुकिंग अशा बसेस सोडण्यात आल्या.यामुळे गणेशोत्सवात महाड आगाराने तब्बल २१ लाख ३३ हजाराचे जादा उत्पन्न कमावले.

Comments
Add Comment

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर