'रूपाली चाकणकर सोयीनुसार बाप बदलतात'

रोहिणी खडसे यांची रुपाली चाकणकरांवर घणाघाती टीका


जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khase) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंवर टीका केली. यावरून आता वाक युद्ध सुरू झाले असून रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांवर घणाघाती टीका केली आहे.


‘रूपाली चाकणकर ह्या बाप बदलणांऱ्या सारख्या आहेत’ असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. “रूपाली चाकणकर यांना बाप बदलणं सोपं आहे. आधी पवार साहेबांसोबत होत्या, नंतर अजित पवार. ज्या जनतेने सर्व दिलं, त्या जनतेच्या होऊ शकत नाहीत, त्या आपल्या काय होतील?” अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांवर टीका केली.


“तुमच्या नेहमीच्या वक्तव्याबाबत खाली येत असलेल्या कमेंट एकदा वाचा. मग तुम्हाला तुमचं अस्तित्व कळेल. ज्यांचं नगरपालिकेत डिपॉझिट जप्त झालंय अशा लोकांचा जनाधारक शिल्लक राहिलेला नाहीय. रूपाली चाकणकरांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.


“माझ्या वडिलांच्या वारशावर मी सध्या काम करते, याचा मला अभिमान आहे. माझ्या वडिलांचा वारसा घेऊनच मी पुढे गेली आहे. रूपाली चाकणकर ह्या शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने सध्या पद भोगत आहेत. शरद पवार साहेबांच्या भरोशावर आतापर्यंत पद यांना मिळत आली आहेत” अशी टीकाही रोहिणी खडसे यांनी केली.


दरम्यान, एकनाथ खडसे म्हणाले की, “रूपाली चाकणकर यांना मी म्हणतो, दुसऱ्यांच्या घरात डोकावणं चांगलं नाही. रूपाली चाकणकर आधी तुम्ही तुमचं स्वतःचं बघा. आधी शरद पवारांकडे तुम्ही होता, नंतर अजितदादांकडे गेलात, तर तुमचं काय?” असे एकनाथ खडसे म्हणाले.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार